शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:23 AM

‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

सासवड : ‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. या सामान्य माणसाला आधार देण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे,’ असे प्रतिपादन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड येथे केले.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सासवड येथे एल्गार आंदोलन करण्यात आले. त्या वेळी झालेल्या सभेत सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य पावले उचलली नाहीत. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, अशी महाराष्ट्राच्या वाट्याला बदनामी आली. विरोधीपक्षाच्या संघर्ष यात्रेनंतर व शेतकºयांच्या संपामुळे सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण आॅनलाइनमुळे शेतकºयांना अर्जच भरता आले नाहीत. बळीराजाला बोगस म्हणणाºया बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आली असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, कृषी मालाची खरेदी करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज तातडीने देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तहसीलदार सचिन गिरी यांनी निवेदन स्वीकारले.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुदाम इंगळे, सारिका इंगळे, विराज काकडे, बबूसाहेब माहूरकर, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, माजी सभापती गौरीताई कुं जीर, माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, योगेश फडतरे, राहुल शेवाळे, सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप, बंडूकाका जगताप, दत्तानाना जगताप, महेश जगताप इ. उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी