शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:12 IST

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता

सचिन दिवाण 

पुणे : बांगला देशात सोमवारी झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांत घुसखोरीची शक्यता असून, ती रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केले.

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता. त्याचा संदर्भ देत पित्रे म्हणाले की, वर्ष १९७१ मध्ये जेसोर येथे झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या शरणागती कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी केलेल्या कत्तली आम्ही पाहिल्या आहेत. आताही बांगलादेशातील सत्तांतरामागे त्याच विचारांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांचा हात आहे. वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहणे दु:खद आहे. तेथे लोकशाही परतणे गरजेचे आहे.

बांगला देश आणि भारतीय जनतेचे पूर्वापार आणि घनिष्ठ संबंध राहिले आहेत. भाषा आणि संस्कृती हे दोन्ही देशांना बांधणारे महत्त्वाचे घटक आहेत. बांगला देशातील परिस्थितीचा भारतावर नक्कीच परिणाम होईल. आता बांगला देशातून भारतात घुसखोरी होण्याची अधिक शक्यता आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, असे मत पित्रे यांनी व्यक्त केले. तसेच बांगला देश स्वतंत्र झाला तेव्हा तेथे १८ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली असल्याचे सांगत या हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्या पुढे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पित्रे म्हणाले की, शेख हसीना यांना दीर्घकाळ आश्रय देणे भारत किंवा ब्रिटनसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यांनी अधिक तटस्थ देशात जाणे जास्त योग्य ठरेल, असेही पित्रे म्हणाले. बांगला देशात चीन आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतले असल्याने तेथील घडामोडींमागे या दोन देशांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. तसेच तेथील परिस्थिती सतत बदलत असल्याने खात्रीशीर भाष्य करणे शक्य नाही, असेही सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशIndiaभारतSocialसामाजिकPresidentराष्ट्राध्यक्षForceफोर्स