शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यास प्राधान्य गरजेचे; मेजर जनरल शशिकांत पित्रे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:12 IST

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता

सचिन दिवाण 

पुणे : बांगला देशात सोमवारी झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांत घुसखोरीची शक्यता असून, ती रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केले.

बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता. त्याचा संदर्भ देत पित्रे म्हणाले की, वर्ष १९७१ मध्ये जेसोर येथे झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या शरणागती कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी केलेल्या कत्तली आम्ही पाहिल्या आहेत. आताही बांगलादेशातील सत्तांतरामागे त्याच विचारांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांचा हात आहे. वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहणे दु:खद आहे. तेथे लोकशाही परतणे गरजेचे आहे.

बांगला देश आणि भारतीय जनतेचे पूर्वापार आणि घनिष्ठ संबंध राहिले आहेत. भाषा आणि संस्कृती हे दोन्ही देशांना बांधणारे महत्त्वाचे घटक आहेत. बांगला देशातील परिस्थितीचा भारतावर नक्कीच परिणाम होईल. आता बांगला देशातून भारतात घुसखोरी होण्याची अधिक शक्यता आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, असे मत पित्रे यांनी व्यक्त केले. तसेच बांगला देश स्वतंत्र झाला तेव्हा तेथे १८ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली असल्याचे सांगत या हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्या पुढे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पित्रे म्हणाले की, शेख हसीना यांना दीर्घकाळ आश्रय देणे भारत किंवा ब्रिटनसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यांनी अधिक तटस्थ देशात जाणे जास्त योग्य ठरेल, असेही पित्रे म्हणाले. बांगला देशात चीन आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतले असल्याने तेथील घडामोडींमागे या दोन देशांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. तसेच तेथील परिस्थिती सतत बदलत असल्याने खात्रीशीर भाष्य करणे शक्य नाही, असेही सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशIndiaभारतSocialसामाजिकPresidentराष्ट्राध्यक्षForceफोर्स