शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राज्य मंडळाकडून दहावीच्या निकालाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

पुणे : राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल ...

पुणे : राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा मंगळवारी (दि. १) प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांना इयत्ता नववी व दहावीतील विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच, दहावीचा निकाल इयत्ता नववीमधील गुण आणि शाळास्तरावर इयत्ता दहावीत घेतलेल्या विविध परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले. त्यानुसार राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.‌ प्रत्येक विद्यार्थ्याने विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेले गुण शाळांकडून राज्य मंडळ मागविणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण शाळांनी कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत याबाबतचा आराखडा राज्य मंडळाकडून तयार केला जात आहे.

राज्यातील काही शिक्षकांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार कच्चा आराखडा तयार केला होता. सचिन वाकचौरे या शिक्षकाने तयार केलेला आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केवळ निकाल तयार करण्याची प्राथमिक तयारी म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. राज्य मंडळाच्या निकालात काही विषयांना श्रेणी (ग्रेड) दिली जाते. या विषयांचे गुण कसे घ्यावेत? याबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांनी मध्ये संभ्रम आहे.

-----------------

इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळांनी कोणत्या स्वरूपात राज्य मंडळाला गुण पाठवावेत याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या मंगळवारी यासंदर्भातील आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडे शाळांनी गुण पाठविणे आवश्यक आहे.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

--------------------

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार तयार केलेल्या कच्च्या आराखड्यावर शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. गुणपत्रिकेत श्रेणी दिल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षणसारख्या विषयांचे गुण कसे द्यावेत, याबाबत अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या मनात शंका आहेत. मंडळाकडून या शंकांचे निरसन होईल, अशी अपेक्षा आहे.

- सचिन वाकचौरे, शिक्षक

------------

दहावी परीक्षेस नोंदणी केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या

एकूण विद्यार्थी : १६ लाख २०६

मुले : ८ लाख ६६ हजार ५७२

मुली : ७ लाख ३३ हजार ५३२

ट्रान्सजेंडर : १०२

------------

----------