शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 21:36 IST

तब्बल 40 हजार लोकांना विभागात करावे लागले स्थलांतरीत 

ठळक मुद्दे8 व्यक्ती दगावल्या, 31 हजार घरांची पडझड,  1021 जनावरे मयत

पुणेपुणे विभागात बुधवार (दि.14) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक 58 हजार पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यातील तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 8 व्यक्ती मयत झाल्या असून,  तब्बल 1 हजार 21 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून,  तब्बल 3 हजार 156 घरांची पडझड झाली असून,  100 झोपड्या देखील पडल्या आहेत. 

राज्यासह पुणे विभागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा फार मोठा फटका पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला बसला आहे. बुधवारी (दि 14) रोजी विभागात मुसळधार पाऊस झाला. यात तब्बल 16 तालुक्यात एका दिवसात शंभर मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने 40 हजार 36 लोकांना स्थलांतरीत करावे लागले. या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 4, सांगली जिल्ह्यात 3 आणि पुणे जिल्ह्यात एक व्यक्ती मयत झाली. जीवत हानी सोबतच जनावरांना देखील पावसाचा फटका बसला आहे. यात सोलापूर जिल्ह्यात 829 व पुणे जिल्ह्यात 153 जनावरे वाहून गेली आहेत. ---- अतिवृष्टीमुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती जिल्हा       हेक्टर क्षेत्र       घरांची पडझड     मयत जनावरे पुणे           18,746            265                    153सातारा        1,420            267                    11सांगली        8,276            365                     28सोलापूर       58,581          2,256               829कोल्हापूर     393               03                     0एकूण         87146           3156                 1029

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार