शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा खेळ चीड आणणारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 12:43 IST

राजकीय लोकांनी मतदारराजाचा अपमान केलेला आहे.....

ठळक मुद्देस्वार्थासाठी संविधानाची पायमल्ली

पुणे : राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला बहुमत दिले होते. परंतु, दोघांनीही खुर्चीसाठी भांडण करून वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड चीड आणणाऱ्या आहेत. ज्यांना विरोधक म्हणून निवडणुकीत टीका केली, त्यांनाच सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनी लपून-छपून शपथविधी उरकला. असा प्रकार करण्याची काहीच गरज नव्हती. हा सर्व प्रकार भारतीय संविधानाचा अपमान आहे. तसेच राजकीय लोकांनी मतदारराजाचा अपमान केलेला आहे, अशा तीव्र भावना तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या...

'स्वार्था' साठी संविधानाची पायमल्ली : अ‍ॅड़ एस़ के़ जैन...

 डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी बनविलेले संविधान इतके स्पष्ट आणि सर्व भूमिका अगदी सविस्तर सांगितली आहे़. मात्र, गेल्या ७० वर्षांत प्रत्येक पक्षाने आपल्या सोयीनुसार आणि स्वार्थासाठी त्याचा वेगवेगळा अर्थ लावला आहे़. जेव्हा त्यांना सोयीचे तेव्हा राज्य सरकार बरखास्त केले़ आपल्या सोयीप्रमाणे राजकीय व्यक्तींची राज्यपालपदी नियुक्त्या केल्या़ व्यवहार आणि तरतुदी यामध्ये राजकारण आल्याने त्यात विसंगती दिसू लागली़. सत्तारुढ असताना त्यांची न्यायालयाच्या निर्णयाबाबत एक भूमिका असते आणि विरोधी पक्षात असताना त्यांना हीच न्यायालयाने दबावाखाली असल्याचे वाटते़ इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये सर्वाच्च न्यायाधीशांची नेमणूक करताना सुपरसिट करुन दुसऱ्या न्यायाधीशांची नेमणुक केली होती़. सरकारला सोयीची भूमिका घेणाऱ्या न्यायाधीशांची नेमणूक केली असे समर्थन केले होते़. अरुण जेटली यांनी सांगितले होते की, न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतर पुढील ३ वर्षे त्यांची कोणत्याही पदावर नेमणूक करण्यात येऊ नये़ पण, ते पाळले जात नाही़. सत्तारुढ पक्षाला जेव्हा सोयीचे असेल तेव्हा विधानसभेत बहुमताची चाचणी घेण्यावर भर असतो़. तळेगाव येथील संघाचे कार्यकर्ते असलेले कृष्णराव भेगडे यांच्यावर दबाव टाकून त्यांना काँग्रेसमध्ये घेतले गेले होते़. वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकून आपल्याला सोयीचे असेल तेव्हा पक्षांतर करुन घेतले जाते़. १९६० मध्ये केरळमधील कम्युनिस्ट सरकारही अशाच प्रकारे बरखास्त करण्यात आले होते़. राष्ट्रपतीचा उपयोग करुन पक्षाला सोयीचे होईल, अशांना राज्यपाल नेमले जाते़. काँग्रेसने जे केले तेच काही प्रमाणात आता भाजपा करीत आहे़. त्यामुळे कोणा एका पक्षाला जबाबदार धरता येणार नाही़. निवडणुकांपूर्वी पक्षांनी सादर केलेल्या जाहीरनाम्यात अनेकाना आपण हे करु शकणार नाही, हे माहिती असते़. तरीही ते फुकट देऊ, पाच रुपयात, दहा रुपयात देऊ अशा घोषणा करतात़. विरोधात असताना आरक्षणाबाबत त्यांची एक भुमिका असते आणि सत्तेवर आल्यावर एक भूमिका असते़. सोयीचे असेल त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष भूमिका बदलत असतात़ त्यात जनता मात्र भरडली जात आहे़. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारCourtन्यायालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना