शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

इतिहासाच्या अभ्यासातून निर्माण व्हावी सकारात्मक दृष्टी : भूषण गोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 20:19 IST

ऐक्याला बळ देणारे ‘भारतीयत्व’ हेच आपले वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे..

ठळक मुद्देगुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने चर्चासत्र काश्मीर हे केवळ नंदनवन नाही तर, ती ज्ञानभूमी, वीरभूमी आणि तपस्याभूमी

पुणे : सगळे जण भारतात आनंदाने नांदू शकतात, हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आज आपण वेगवेगळ्या कारणाने आपापसांत भांडत आहोत. ते पाहता इतिहासाच्या अभ्यासातून सकारात्मक दृष्टी नांदली पाहिजे. ऐक्याला बळ देणारे ‘भारतीयत्व’ हेच आपले वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. येशू ख्रिस्त आणि काश्मीर या विषयाच्या पार्श्वभूमीवर वादविवादाच्या पलीकडे जाऊन त्या काळातली सांस्कृतिक मिसळण लक्षात घेतली पाहिजे, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘जम्मू काश्मीर आणि येशू ख्रिस्ताचे अज्ञात चरित्र’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. स्वामी कृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सरहद संस्थेचे संजय नहार, लेखक संजय सोनवणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. अनिल दहीवाडकर, डॉ. भालचंद्र कापरेकर, अमृता देसर्डा, प्रवीण श्रीसुंदर आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते.सोनवणी म्हणाले, मेलटिंग पॉईंट ऑफ युनिव्हर्सल कल्चर हे वैशिष्ट्य असलेल्या काश्मीरमध्ये येशू ख्रिस्त आले असल्याचा उल्लेख आहे. निकोलस नोटोविच यांनी मांडलेल्या तथ्याचा वीरचंद गांधी यांनी केलेला अनुवाद खरा ठरल्यास खरे बायबल सर्वांसमोर येईल. मात्र, याचा वस्तुनिष्ठपणे अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.नहार म्हणाले, येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये आले असल्याचा सिध्दांत खरा ठरल्यास जगाला आपण शांततेचा संदेश दिला, याला पुष्टी मिळेल. भारताचा इतिहास गरजेपुरता मांडला जातो, हाही ठपका मोडून काढता येईल.येशू ख्रिस्त वयाच्या १३ ते २९ वर्षांत कुठे होते, याबद्दल इतिहास मौन बाळगून आहे. बौद्ध धर्माची शिकवण आणि येशू ख्रिस्ताने केलेला उपदेश यात साम्य असल्याचे श्रीसुंदर यांनी सांगितले. बायबलमधील येशू चरित्राचा बारकाईने अभ्यास केल्यास ते काश्मीरमध्ये आले असल्याचे सिद्ध होत नाही; पण अलीकडे मांडण्यात येत असलेले संशोधनपूर्वक मतांचा विचार करायला हवा, असे डॉ. अनिल दहीवाडकर यांनी सांगितले.कामत म्हणाले, काश्मीर हे केवळ नंदनवन नाही तर, ती ज्ञानभूमी, वीरभूमी आणि तपस्याभूमी आहे. ज्यांना जगासाठी काही करायचे आहे, अशा भगवान महावीर, गौतम बुद्ध, राम-कृष्ण यांच्यासह येशू ख्रिस्तापर्यंत सगळ्यांना काश्मीरमध्ये जावं वाटलं कारण तशी अनुकूलता तिथं होती. ही अनुकूलता जगाला समजावून सांगितल्यास भारताचा आणि जगाचाही काश्मीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.डॉ. करमळकर यांनी याबाबत अभ्यासाची गरज व्यक्त केली. अमृता देसर्डा यांनी वीरचंद गांधी यांच्या ‘द अननोन लाईफ आॅफ जिझस ख्राइस्ट’ या पुस्तकातील तर दीपक करंदीकर यांनी 'कृसावर चढण्यापूर्वी' आणि 'पुनरुत्थानंतर येशू ख्रिस्ताचे अज्ञात जीवन' या पुस्तकातील आशय विवेचन केले. डॉ. कापरेकर यांनी येशू यांच्या ज्ञात चरित्रावर प्रकाश टाकला. शुभदा वर्तक यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासJammu Kashmirजम्मू-काश्मीरSanjay Naharसंजय नहार