शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 20:43 IST

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

 

पुणे : प्रेरणा ही ध्येयाच्या जवळ सर्वांत महत्वाची गोष्ट मानली जाते. एखाद्या प्रेरणेने झपाटलेल्या व्यक्तीने अशक्य गोष्टही शक्य करून दाखवल्याची उदाहरणे अनेकदा बघायला मिळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

           भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचा कणा असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे १६६ निर्दोष व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. त्यात हेमंत करकरे,अशोक कामठे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे या बहादूर पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र याच हल्ल्याच्या ठिकाणी हजार असलेल्या आणि  सुदैवाने प्राण वाचलेल्या अविनाश यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला, कर्तृत्वाला प्रेरणा मनात ११ वर्षांनंतर पोलीस  उपनिरीक्षकपदाचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

           अविनाश हे पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील रहिवासी. सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांपासून प्रेरणा घेत त्यांनी आपले स्वप्न साकार केली आहे. एमबीए झालेल्या अविनाश यांचे चांगल्या पगाराच्या नोकरीत मन रमत नव्हते. अखेर  रामराम ठोकत कष्टाने त्यांनी ध्येयपूर्ती केली आहे. याबाबत ते सांगतात, 'मी एका नातेवाईकाला भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यावेळी मला मुंबईत फारशी माहिती नसल्याने संबंधित नातेवाईकाने मला सी.एस. टी. स्टेशनला यायला सांगितले. त्यावेळी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबाराचे आवाज येण्यास सुरुवात झाली आणि मी इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे पळतच स्टेशनच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यावर काही वेळाने दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची जाणीव झाली. या दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला आणि मी पोलीस खाते हेच माझे ध्येय म्हणून निश्चित केली. त्यादृष्टीने पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची तयारी केली आणि उत्तीर्ण झालो.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला