शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 20:43 IST

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

 

पुणे : प्रेरणा ही ध्येयाच्या जवळ सर्वांत महत्वाची गोष्ट मानली जाते. एखाद्या प्रेरणेने झपाटलेल्या व्यक्तीने अशक्य गोष्टही शक्य करून दाखवल्याची उदाहरणे अनेकदा बघायला मिळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

           भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचा कणा असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे १६६ निर्दोष व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. त्यात हेमंत करकरे,अशोक कामठे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे या बहादूर पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र याच हल्ल्याच्या ठिकाणी हजार असलेल्या आणि  सुदैवाने प्राण वाचलेल्या अविनाश यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला, कर्तृत्वाला प्रेरणा मनात ११ वर्षांनंतर पोलीस  उपनिरीक्षकपदाचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

           अविनाश हे पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील रहिवासी. सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांपासून प्रेरणा घेत त्यांनी आपले स्वप्न साकार केली आहे. एमबीए झालेल्या अविनाश यांचे चांगल्या पगाराच्या नोकरीत मन रमत नव्हते. अखेर  रामराम ठोकत कष्टाने त्यांनी ध्येयपूर्ती केली आहे. याबाबत ते सांगतात, 'मी एका नातेवाईकाला भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यावेळी मला मुंबईत फारशी माहिती नसल्याने संबंधित नातेवाईकाने मला सी.एस. टी. स्टेशनला यायला सांगितले. त्यावेळी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबाराचे आवाज येण्यास सुरुवात झाली आणि मी इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे पळतच स्टेशनच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यावर काही वेळाने दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची जाणीव झाली. या दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला आणि मी पोलीस खाते हेच माझे ध्येय म्हणून निश्चित केली. त्यादृष्टीने पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची तयारी केली आणि उत्तीर्ण झालो.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला