शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पुलंच्या अप्रकाशित भाषणांचा दृकश्राव्य ठेवा उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:02 IST

रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत...

ठळक मुद्देग्लोबल पुलोत्सव : जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून विशेष सोहळा८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेशजन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयाने

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांची जन्मशताब्दी साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वत: कलांचा आस्वाद घेतलाच; पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करुन रसिकांवर उधळणही केली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पु. ल. कुटुंबियांच्या वतीने दुर्मिळ दृक-श्राव्य ठेवा रसिकांसाठी खुला केला जाणार आहे. यानिमित्ताने रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेश या लघुपटात केला आहे; या भाषणांबद्दल मान्यवरांचा अभिप्राय असणार आहे.८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि भारतातील सुमारे २० शहरांत आणि भारताबाहेरील ५ खंडांमधील सुमारे ३० शहरांत आयोजित केला जात आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ज्योती ठाकूर, सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मेघराज राजेभोसले, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य उपस्थित होते.पुलंच्या भांडारकर रस्त्यावरील मालती माधव या निवासस्थानी गुणीजनांचा मेळा ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भरणार आहे. यासाठी चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. जन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अ. भा. नाट्यपरिषद, अ. भा. चित्रपट महामंडळ या संस्थांच्या सहयोगाने हा सोहळा संपन्न होईल.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल.-------------पुलंचे साहित्य सर्वांसाठी खुले आहे, असा सर्वत्र समज पसरला आहे. प्रत्यक्षात, सुनीताबाईंनी केवळ पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या प्रयोगांचे हक्क खुले केले होते. तसेच, या नाटकांतील शब्दही बदलू नये, अशी अट घातली होती. पुलंच्या साहित्याचे सर्व हक्क आयुकाकडे हस्तांतरित केले. सध्या या हक्कांबाबत निर्माण झालेला गोंधळ मिटवून प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य