शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुलंच्या अप्रकाशित भाषणांचा दृकश्राव्य ठेवा उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:02 IST

रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत...

ठळक मुद्देग्लोबल पुलोत्सव : जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून विशेष सोहळा८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेशजन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयाने

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांची जन्मशताब्दी साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वत: कलांचा आस्वाद घेतलाच; पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करुन रसिकांवर उधळणही केली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पु. ल. कुटुंबियांच्या वतीने दुर्मिळ दृक-श्राव्य ठेवा रसिकांसाठी खुला केला जाणार आहे. यानिमित्ताने रसिकांना पुलंची अप्रकाशित भाषणे लघुपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. नाटक, संगीत व आभार व्यक्त करणारे एक अशा तीन भाषणांचा समावेश या लघुपटात केला आहे; या भाषणांबद्दल मान्यवरांचा अभिप्राय असणार आहे.८ नोव्हेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि भारतातील सुमारे २० शहरांत आणि भारताबाहेरील ५ खंडांमधील सुमारे ३० शहरांत आयोजित केला जात आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ज्योती ठाकूर, सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मेघराज राजेभोसले, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य उपस्थित होते.पुलंच्या भांडारकर रस्त्यावरील मालती माधव या निवासस्थानी गुणीजनांचा मेळा ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भरणार आहे. यासाठी चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. जन्मशताब्दीची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरात विशेष सोहळयात सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अ. भा. नाट्यपरिषद, अ. भा. चित्रपट महामंडळ या संस्थांच्या सहयोगाने हा सोहळा संपन्न होईल.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल.-------------पुलंचे साहित्य सर्वांसाठी खुले आहे, असा सर्वत्र समज पसरला आहे. प्रत्यक्षात, सुनीताबाईंनी केवळ पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या प्रयोगांचे हक्क खुले केले होते. तसेच, या नाटकांतील शब्दही बदलू नये, अशी अट घातली होती. पुलंच्या साहित्याचे सर्व हक्क आयुकाकडे हस्तांतरित केले. सध्या या हक्कांबाबत निर्माण झालेला गोंधळ मिटवून प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य