शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Airport: तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:41 IST

प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, तसेच, त्यांना साधा चहा, नाष्टादेखील विचारण्यात आला नाही

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी (दि. १) सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी दिल्लीला स्पाइस जेटच्या विमानाने उड्डान केले. त्यांनतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. तेव्हा विमान दिल्लीला न जाता पुन्हा पुणे विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नियमित वेळेनुसार पुण्याहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी दिल्लीसाठी विमान उड्डाण करणार होते. त्यामुळे दोन तास अगोदर प्रवासी विमानतळावार आले होते. वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. ते विमान दिल्ली येथे सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार होते. परंतु विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने विमान पुण्याकडे वळविले. सकाळी सव्वाआठच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरविण्यात आले. यामुळे विमानातील प्रवासी प्रचंड घाबरले होते. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच, त्यांना साधा चहा, नाष्टादेखील विचारण्यात आला नाही. दुपारपर्यंत प्रवाशांची दुसऱ्या विमानात सोय करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. उशिराने दुसऱ्या विमानातून प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी सोय करून दिली.

सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. त्यांनतर एका तासात विमान पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. त्याबाबत विचारणा केली असता विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे, अशी माहिती मिळाली. विमान वळवले नसते तर क्रॅश झाले असते, असे अधिकारी सांगत होते. मात्र, इतर कोणतीही माहिती दिली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विमानतळ प्रशासन आणि विमान कंपनी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. - ॲड. विशाल जाधव, विमान प्रवासी.

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळdelhiदिल्लीairplaneविमानpassengerप्रवासीSocialसामाजिक