शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

By नितीन चौधरी | Updated: August 18, 2022 15:15 IST

सर्वात कमी पाऊस सांगलीत...

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, राज्यात तब्बल १८ लाखांहून अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेल्यात जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलैतील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे २६०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक

राज्यात मान्सून जुलैत दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्येही धुवाधार बरसला. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर विभागात आजवरच्या सरासरीच्या १६१ टक्के पाऊस झाला आहे. जून ते १६ ऑगस्टची सरासरी ७२८.९ मिमी असून, येथे आतापर्यंत ११७७.६ मिमी पाऊस झाला आहे. तर अमरावती विभागातही अतिवृष्टी झाली असून, तेथे सरासरी ५०६.८ मिमी असून, प्रत्यक्षात ६६० मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३० टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात १३५.७ तर नाशिक विभागात ११३.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, कोकणात सरासरी इतका अर्थात १०४.६ टक्के, तर सर्वात कमी ९५.६ टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागाची सरासरी ६५३ मिमी असून, येथे प्रत्यक्षात ६२४.६ मिमी पाऊस झाला.

सर्वात कमी पाऊस सांगलीत

पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अर्थात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर धुळ्यात ९३.२, रायगड ९७.९, तर रत्नागिरीत ९९.३ टक्के पाऊस झाला आहे.

सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना फटका

कृषी विभागाने जुलैत झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार २२ लाख ८८ हजार ८६० शेतकऱ्यांचे तब्बल १८ लाख २१ हजार ४०३ हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या एनडीआरएफच्या निकषांनुसार सुमारे १२९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी बदललेल्या निकषांनुसार ही रक्कम आता दुप्पट अर्थात २६०० कोटी रुपये झाली आहे.

ही भरपाई जुलैमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८० हजार हेक्टर नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यात आणखी वाढ होईल. मात्र, खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातील हंगाम वाया गेला आहे. त्यांना आता रब्बी हंगामावरच अवलंबून राहावे लागेल.

- विकास पाटील, कृषी संचालक, पुणे

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र