शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

By नितीन चौधरी | Updated: August 18, 2022 15:15 IST

सर्वात कमी पाऊस सांगलीत...

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, राज्यात तब्बल १८ लाखांहून अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेल्यात जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलैतील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे २६०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक

राज्यात मान्सून जुलैत दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्येही धुवाधार बरसला. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर विभागात आजवरच्या सरासरीच्या १६१ टक्के पाऊस झाला आहे. जून ते १६ ऑगस्टची सरासरी ७२८.९ मिमी असून, येथे आतापर्यंत ११७७.६ मिमी पाऊस झाला आहे. तर अमरावती विभागातही अतिवृष्टी झाली असून, तेथे सरासरी ५०६.८ मिमी असून, प्रत्यक्षात ६६० मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३० टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात १३५.७ तर नाशिक विभागात ११३.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, कोकणात सरासरी इतका अर्थात १०४.६ टक्के, तर सर्वात कमी ९५.६ टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागाची सरासरी ६५३ मिमी असून, येथे प्रत्यक्षात ६२४.६ मिमी पाऊस झाला.

सर्वात कमी पाऊस सांगलीत

पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अर्थात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर धुळ्यात ९३.२, रायगड ९७.९, तर रत्नागिरीत ९९.३ टक्के पाऊस झाला आहे.

सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना फटका

कृषी विभागाने जुलैत झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार २२ लाख ८८ हजार ८६० शेतकऱ्यांचे तब्बल १८ लाख २१ हजार ४०३ हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या एनडीआरएफच्या निकषांनुसार सुमारे १२९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी बदललेल्या निकषांनुसार ही रक्कम आता दुप्पट अर्थात २६०० कोटी रुपये झाली आहे.

ही भरपाई जुलैमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८० हजार हेक्टर नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यात आणखी वाढ होईल. मात्र, खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातील हंगाम वाया गेला आहे. त्यांना आता रब्बी हंगामावरच अवलंबून राहावे लागेल.

- विकास पाटील, कृषी संचालक, पुणे

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र