शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 09:57 IST

''आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे'', या म्हणीप्रमाणे लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करणार

दीपक जाधव

सुपे : सामाजिक कामाची आवड असलेला सुपे (ता. बारामती) येथील विलास वाघचौरे कधी सायकलवरून, कधी मोटारसायकलवरून तर कधी पायी भारतभर फिरून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे; पण आजही सर्वांच्या कुतूहल व भीतीचा विषय कायम मनात राहिला आहे. त्यामुळे साप चावल्यावर अनेकांना त्यावर उपचार काय करावयाचे, याबाबत माहिती नसते. पावसाळ्यात सापांचे बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सुपा भागासह देशभरात भ्रमंती करीत विलास वाघचौरे हा अवलिया सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला अन् थेट केदारनाथमध्ये दर्शनाला पोहोचला. यादरम्यान त्याने चक्क पायी १८०० किलोमीटरचा टप्पा पार केला.

सुपे येथील या अवलियाने केदारनाथचा १८०० किलोमीटरचा प्रवास चक्क पायी केला आहे. त्यामुळे त्याने केलेल्या प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. त्याने यापूर्वी सायकल, दुसऱ्या वर्षी दुचाकी आणि आताा चक्क पायी केदारनाथ प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याने नागरिकांना पर्यावरणविषयक तसेच विविध सापांविषयी सर्पदंशबाबत जनजागृती करण्याचे काम करीत आहे. विलास विठ्ठल वाघचौरे, असे या सर्पमित्र अवलियाचे नाव आहे. विलास याने २०२२ साली मोटारसायकलवर ५ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करत ‘पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश देत केदारनाथचे अंतर पूर्ण केले होते. त्यानंतर सन २०२३ साली सायकलवर ५ हजार ६०० किलोमीटर अंतर देखील सामाजिक संदेश देत पूर्ण केले होते.

यावर्षी १८ फेब्रुवारी २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी बारामती भिगवण चौक गणेश मंदिरपासून प्रवासाला सुरुवात करून तब्बल १८०० किलोमीटरची पदयात्रा ९० दिवसांत केदारनाथला पोहोचून पूर्ण केली. तो गुरुवारी (दि. २३) सुप्यात परत आला. सुपे येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही जनमाणसात त्याने त्याची प्रतिमा अबाधित ठेवली आहे. या पायी प्रवासादरम्यान ॲड. श्रीनिवास वायकर यांचे वेळोवेळी विचारपूस आणि मार्गदर्शन मिळाले. यावेळी या पायी प्रवासामध्ये खूप काही शिकायला मिळालं. लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

आवड असली की सवड आपोआप मिळते

विलास याने यापूर्वीही मोटारसायकलवर ५ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करत ‘पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा देत केदारनाथचे अंतर पूर्ण केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये सायकलवर ५ हजार ६०० किलोमीटर अंतर देखील सामाजिक संदेश देत पूर्ण केले होते. आवड असली की सवड आपोआप मिळते. आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे. या म्हणीप्रमाणे लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करणार असल्याचे विलास याने यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेKedarnathकेदारनाथFarmerशेतकरीTrekkingट्रेकिंगSocialसामाजिक