शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं आयुष्य शेतीवर, निसर्ग साथ देत नसेल, तर शासनाने आधार द्यावा' अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:07 IST

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे

ओतूर : महाराष्ट्र राज्यातील हवामान हे नेहमीच ऋतुचक्रानुसार बदलत असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंनी येथील जीवनमानाला आणि व्यवसायांना एक विशिष्ट लय दिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ऋतुचक्रावरही हवामान बदलाचा मोठा परिणाम जाणवू लागला असून, चालू वर्षी त्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.

पावसाळा ऋतू अधिकृतरीत्या संपून जवळपास एक महिना उलटून गेला असतानाही, ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडवले आहे. गेल्या काही दिवसांपासून माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, उदापूर, डोंगरे, मढ, कोपरे मांडवे, धोलवड, हिवरे खुर्द, नेतवड, पिंपळगावजोगा, डुंबरवाडी, मांदारने, बल्लाळवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे.

या अवकाळी पावसामुळे कांदा, भात, गहू, टोमॅटो आणि भाजीपाला अशा सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश, खचलेला आणि असहाय्य अवस्थेत उभा आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जात आहे एवढी मेहनत, एवढे कष्ट करूनही पिकांचे हे हाल होताना बघणे मन हेलावून टाकणारे आहे.” काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना नुकसानीमुळे पुढील हंगाम कसा पार पाडायचा, कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने ग्रासले आहे.

याशिवाय, कीटक रोगराई, बुरशीजन्य संसर्ग आणि सततचे आर्द्र वातावरण यामुळे तयार भातपिकांवर दुष्परिणाम झाला असून, त्यामुळे “काय पेरावे, काय करावे?” हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस महागडा होत चालला आहे, तर दुसरीकडे निसर्गाची अवकृपा संपत नाही. बियाणे, खत, औषधे आणि मजुरी या सगळ्यांवर खर्च वाढत असताना, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या ओझ्याचे पर्वत झाले आहेत. बहुतांश शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले असून, आता पिकांचे नुकसान झाल्याने त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली आहे. “आमचं आयुष्य शेतीवर अवलंबून आहे; जर निसर्ग साथ देत नसेल, तर शासनानं तरी आधार द्यावा,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers devastated by unseasonal rain, seek government support for survival.

Web Summary : Unseasonal rains in Malshej have ruined crops like onion, rice, and vegetables, leaving farmers helpless. They face mounting debts and worry about future harvests. Farmers urge the government to provide support as their livelihoods depend on agriculture.
टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNatureनिसर्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRainपाऊसfloodपूर