शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

'आमचं आयुष्य शेतीवर, निसर्ग साथ देत नसेल, तर शासनाने आधार द्यावा' अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:07 IST

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे

ओतूर : महाराष्ट्र राज्यातील हवामान हे नेहमीच ऋतुचक्रानुसार बदलत असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंनी येथील जीवनमानाला आणि व्यवसायांना एक विशिष्ट लय दिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ऋतुचक्रावरही हवामान बदलाचा मोठा परिणाम जाणवू लागला असून, चालू वर्षी त्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.

पावसाळा ऋतू अधिकृतरीत्या संपून जवळपास एक महिना उलटून गेला असतानाही, ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडवले आहे. गेल्या काही दिवसांपासून माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, उदापूर, डोंगरे, मढ, कोपरे मांडवे, धोलवड, हिवरे खुर्द, नेतवड, पिंपळगावजोगा, डुंबरवाडी, मांदारने, बल्लाळवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे.

या अवकाळी पावसामुळे कांदा, भात, गहू, टोमॅटो आणि भाजीपाला अशा सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश, खचलेला आणि असहाय्य अवस्थेत उभा आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जात आहे एवढी मेहनत, एवढे कष्ट करूनही पिकांचे हे हाल होताना बघणे मन हेलावून टाकणारे आहे.” काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना नुकसानीमुळे पुढील हंगाम कसा पार पाडायचा, कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने ग्रासले आहे.

याशिवाय, कीटक रोगराई, बुरशीजन्य संसर्ग आणि सततचे आर्द्र वातावरण यामुळे तयार भातपिकांवर दुष्परिणाम झाला असून, त्यामुळे “काय पेरावे, काय करावे?” हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस महागडा होत चालला आहे, तर दुसरीकडे निसर्गाची अवकृपा संपत नाही. बियाणे, खत, औषधे आणि मजुरी या सगळ्यांवर खर्च वाढत असताना, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या ओझ्याचे पर्वत झाले आहेत. बहुतांश शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले असून, आता पिकांचे नुकसान झाल्याने त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली आहे. “आमचं आयुष्य शेतीवर अवलंबून आहे; जर निसर्ग साथ देत नसेल, तर शासनानं तरी आधार द्यावा,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers devastated by unseasonal rain, seek government support for survival.

Web Summary : Unseasonal rains in Malshej have ruined crops like onion, rice, and vegetables, leaving farmers helpless. They face mounting debts and worry about future harvests. Farmers urge the government to provide support as their livelihoods depend on agriculture.
टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीNatureनिसर्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRainपाऊसfloodपूर