शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षदाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: July 5, 2014 23:23 IST

भिगवण, तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बारामती : भिगवण, तक्रारवाडी   (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, मुलीच्या आईने तिला पळवून नेलेल्या सराईत गुन्हेगार तरुणाचे नाव भिगवण पोलिसांना दिले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेणा:या पोलिसांचीदेखील चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी दिली.
‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आली. तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणा:या कर्मचा:यांची खातेनिहाय चौकशी करण्यात  येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जवळपास 21 दिवसांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी राहुल सपकाळे यास अटक केली आहे. मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होणार आहे, तरीदेखील खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
 मयत अक्षदा बाळासाहेब पाटोळे ही अल्पवयीन मुलगी 17 जूनपासून बेपत्ता होती. 1 जुलै रोजी तिचा खालापूर, रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे. या प्रकरणी राहुल सपकाळे यांस अटक करण्यात आली आहे. तिची आई अनिता पाटोळे यांनी पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्याने अक्षदा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर अक्षदा आज जिवंत असती, असेदेखील त्यांचे म्हणण्ेा आहे. 
याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी सांगितले, की वालचंदनगर पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षदा हिचा शवविच्छेदन अहवाल मागवण्यात आला आहे. पोलिसांनी दखल घेतली असती, तर मुलीचा जीव वाचला असता. तक्रारीची वेळेत दखल न  घेणा:या पोलिसांची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
 .. टोलवा-टोलवीमुळे मुलीचा जीव गेला
4माङया मुलीचे व आरोपीचे कोणतेही काही संबंध नव्हते. मात्र, त्याने लग्नासाठी तिला मागणी घातली होती. आरोपी राहुल सपकाळे याची चौकशी केली असता, तो गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे समजले. त्यामुळे त्याने लगAासाठी घातलेली मागणी आम्ही मान्य केली नाही. अक्षदाला पळवून नेण्याच्या 1 दिवस अगोदर आरोपीने धमकी दिली होती. त्याची देखील माहिती मी पोलिसांनी दिली. त्यानेच पळवून नेल्याची माहिती दिली. मात्र, भिगवण पोलिसांनी टोलवा-टोलवी केली, त्यामुळे माङया मुलीचा जीव गेला, अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.