शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

...तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल" बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 09:06 IST

आजचे शिक्षण एकदम रुक्ष असल्याने पोरंही रुक्ष होतायेत

श्रीकिशन काळे

पुणे : आजचे शिक्षण एकदम रुक्ष आहे. ते मुलांना डाचत असते. त्यामुळे पोरंही रुक्ष होत जातात. खरंतर शिक्षकांनी मुलांना सांगितले पाहिजे की, पहाटे फुल कसे उमटले ते पहा? कळीची एक-एक पाकळी कशी फुलते ते पहा. निसर्गातील घटकांचे निरीक्षण करा. टेकड्या, बागा, किल्ल्यांवर भटकंती करा. डोळे आहेत तर शोधलं पाहिजे, तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल, असा सल्ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांनी शिक्षक, पालक, मुलांना दिला.

बालदिनानिमित्त सोमवारी (दि. १४) नवी दिल्लीत संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आज पुण्यातून दिल्लीला येताना खूप छान वाटतंय. मी मन लावून लिहित गेले. त्यापासून काही अपेक्षा मनात ठेवल्या नव्हत्या. माझ्यातही एक मूल दडलेले आहे. त्यामुळे ‘पियूची वही’ लिहिताना ते मुलांना आवडेल असे वाटले होते. मला स्वत:ला ते आवडले होते.

माझं बालपण गावाकडे गेलं. त्यामुळे निसर्ग जवळून अनुभवला. गेली चाळीस वर्षे शहरात राहतेय. शहरातही निसर्ग अनुभवता येतो. कुंडीत रोज कळी कशी उमलते ते पाहता येते. बागेत रोपं असतात. कळीचे फुल कसे हाेते, ते पाहण्यासाठी मी स्वत: पहाटे ३ वाजता उठून रोपासमोर तासनतास बसले आहे. कळी उमलतानाचा आनंद उपभोगला आहे. मनातून इच्छा असेल तर आपल्याला गावातील निसर्ग शहरात मुलांना दाखविता येतो.

गावाकडे मुले शाळेत जाताना आजूबाजूला झाडे असतात, हिरवळीतून जातात. शाळाही सुंदर असते. तिथे काही नियम नसतात. त्यामुळे ती चांगल्याप्रकारे मोकळी वाढतात. त्याच धर्तीवर शहरातील मुले मात्र बंदिस्त वाटतात. त्यांनाही पालक आनंद देण्यासाठी प्रयत्न करतात. पण टीव्ही, मोबाइलमुळे ती निसर्गात जात नाहीत. त्यांना मोकळे जगू द्यावे.

बालसाहित्य हे मुलांपर्यंत पोहचविले पाहिजे. त्यातील कविता मोठ्या वाचू शकतो, सादर करू शकतो, हे मुलांना सांगायला हवे. आजही मुले लिहीत आहेत. शाळा, शिक्षक प्रयत्न करत आहेत. फक्त झालंय काय इंग्रजी माध्यम खूप वाढलंय. मराठी लिहिणं कमी होत आहे. तरी पालक मराठीत प्रयत्न करतात. पाठ्यपुस्तकांशिवाय मुलांनी पुस्तके वाचावीत. त्यावर गप्पा माराव्यात. पाठ्यपुस्तक मंडळानेच अशी पुस्तक अभ्यासाला ठेवावीत. तरच खऱ्या अर्थाने मुले आनंददायी शिक्षण घेतील.

मुलगी अन् आईदेखील म्हणू लागली मराठी गाणी

ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार... या इंग्रजी गाण्याकडे मुलं वळतात. पण आपण त्यांना मराठी गाणी दिली पाहिजेत. माझ्या घराशेजारी एक छाेटी मुलगी इंग्रजी कविता वाचत होती. ते मी पाहिले. ती मराठी मात्र कविता वाचत नव्हती. मग मीच तिला गाणी हाताने लिहून दिली, तर तिने ती गाणी छान म्हटली. तिची आई सुद्धा म्हणायला लागली. तिच्याकडे मराठी गाणी नव्हती; पण आपण ती मुलांना दिली पाहिजेत. हे काम शिक्षक, पालक सर्वांचे आहे.

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिनEducationशिक्षणSocialसामाजिकTeacherशिक्षकJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू