शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:58 IST

हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही. 

ठळक मुद्देसर्वपक्षीय रोष : पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची कुजबूज 

पुणे: वेगवेगळ्या समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेससह शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष पालकमंत्री गिरीश बापट यांना पेचात पकडत आहेत. आरोप, मोर्चे, निदर्शने, राजीनाम्याची मागणी होत आहे. तरीही बापट काहीच प्रत्युत्तर करत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेची राजकीय कुचंबणा होत आहे. पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची कुजबूज पक्षात सुरू झाली आहे. शहराचा खासदार, आठ आमदार, पक्षाचे १०३ नगरसेवक व महापालिकेत स्पष्ट बहुमत, राज्यात सत्ता, केंद्रातही सत्ता असे असल्यामुळे शहरात भाजपाचे राजकीय वर्चस्व आहे. पालकमंत्री म्हणून बापटच पक्षाचे शहरातील प्रमुख आहेत, मात्र गेले काही वर्षभर सातत्याने ते वादविषय होत आहेत. हिरव्या देठापासून जी सुरूवात झाली ती थांबायलाच तयार नाही. अगदी अलीकडे तर शहराच्या पाण्याच्या विषयावरून ते वादात सापडले आहेत. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री असूनही जलसंपदाने त्यांच्या शहराचे पाणी तीन वेळा तोडण्याचा प्रताप केला. पुण्याचे पाण्यावर संक्रात आणण्याचा पणच केल्यासारखे जलसंपदाचे अधिकारी वागत आहेत.त्यामुळे जलसंपदाच्या विरोधात भाजपाचेच खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिका भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता तर महापौर मुक्ता टिळक तसेच महापालिकेतील भाजपाच्या अन्य पदाधिकाºयांनीही जलसंपदावर तीव्र शब्दात टीका केली. महापौरांनी तर जलसंपदाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तरीही बापट यांनी मात्र यावर काहीच भुमिका घेतली नाही. फारच टीका होऊ लागल्यावर त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली, मात्र त्यातही त्यांनी गोलमटोल भुमिका घेत शेवटी काहीच निर्णय घेतला नाही. हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही. त्यातच रेशनिंग प्रकरण जाहीर झाले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबधीच्या निकालात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे स्पष्ट शब्दात खडसावले आहे. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोषी ठरवेलेल्या रेशनिंग दुकानदाराला त्याचा परवाना परत करण्याचे हे प्रकरण आहे व त्यात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे व आम आदमी पार्टी या सर्वच राजकीय पक्षांनी बापट यांच्या विरोधात वेगवेगळे मोर्चे काढले, निदर्शने केली, धरणे धरले व बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात अनेक आरोप, टीका करण्यात आली. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली तर पक्षाच्या शहर शाखचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी लगेचच काकडे यांचा निषेध केला. दानवे यांच्या मदतीला धावली तशी शहर शाखा बापट यांच्या मदतीला मात्र धावायला तयार नाही. ते काही बोलत नाही तर आम्ही कसे मध्येच बोलणार असे शहर शाखेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याच्या समस्येला आम्हाला तोंड द्यावे लागते आहे हे माहिती असूनही ते जलसंपदा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना काही सांगत नसतील तर त्यांना साह्य कसे करावे असा प्रश्न महापालिकेतील पदाधिकारीही विचारतात.बापट यांचे हे मौन आता भाजपाच्याच कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे. त्यांनी सर्व आरोपांना खडसून उत्तर दिले पाहिजे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरील आरोपांना तेच प्रत्युत्तर देऊ शकतात, अन्य पदाधिकारी कसे देतील असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यांच्यातीलच काहींनी पक्षाच्या प्रतिमेवर बापट यांच्या या मौनाचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. इतके मोठे राजकीय वर्चस्व असतानाही केवळ बापट यांच्यामुळे पक्षाला बॅकफूटवर जाणे भाग पडते आहे असे या दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी सांगितले. ---------------------  खुलासा घेतला मागेरेशनिंग प्रकरणावर बापट यांच्या कार्यालयाने एक खुलासा माध्यमांना पाठवला होता, मात्र तो लगेचच मागे घेण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, खुलासा प्रसिद्ध करू नये असे माध्यम प्रतिनिधींना कळवण्यात आले. त्यामुळे बापट यांचे मौन अधिकच प्रसिद्ध झाले आहे. ...................राजकारणाचाच भागशांत बसणे हा बापट यांच्या राजकारणाचाच भाग असल्याचीही चर्चा आहे. प्रत्यूत्तर देत बसले तर विषय वाढतो, न दिले तर लोक ते विसरून जातात याविचाराने बापट यांनी सर्व आरोपांवर चुप्पी बाळगली असल्याचे त्यांच्या निकटच्या समर्थकांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस