शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खडकवासला धरण प्रकल्पात फक्त १४.३३टीएमसी पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:58 PM

वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे.

ठळक मुद्देतीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा 

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात सध्या केवळ १४.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र,उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय झाल्याचे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांपासून अधिका-यांपर्यंत सर्वच बोलत असल्याने पुणेकरांच्या डोक्यावरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. परंतु, वाढलेली लोकसंख्या आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करता काटकसरीनेच पाणी वापरावे लागणार आहे.सध्या धरणात मागील तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. पुणे महापालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने दिला आहे. मात्र,धरणातील पाणीसाठा कमी असल्याने आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित झाल्याने यंदा उन्हाळी आवर्तन सोडले जाणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. पुणे महापालिकेकडून १३५० एमएलडी पाणी वापरले जात असून पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. परंतु,गेल्या तीन वर्षाचा  विचार करता यंदा धरणात सर्वात कमी १४.३३ पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी २०१८ रोजी धरण प्रकल्पात १९.१८ टीएमसी तर २ फेब्रुवारी २०१७ रोजी धरणांत १८.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या दोन वर्षात पुण्याच्या लोख संख्येत चांगलीच भर पडली आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्याचे पाणी १३५० एमएलडी पेक्षा कमी केले जाणार नसल्याच्या असा निर्णय झाला असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ्यात कालव्यातून शेतीसाठी सोडले जाणारे आवर्तन रद्द करावे लागणार आहे.परंतु,ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्यासाठी मागणी करण्यात आली तर शेतीसाठी नाही. परंतु, पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे.त्यामुळे पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे.--------गेल्या सहा वर्षाचा ३ फेब्रुवारी रोजीचा खडकवासला धरणप्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसी)वर्ष         पाणीसाठा २०१९        १४.३३२०१८        १९.१८२०१७        १८.२०२०१६        १०.७७२०१५        १६.९५

 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका