शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले डोळ्यांत पाणी! लागवडीचा खर्चही हाती पडेना, शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 00:35 IST

सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

दावडी : सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी शेतातील कांद्याची काढणी करण्याचे टाळत आहे. चाकण येथील मार्केटमध्ये केवळ पाच ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही हाती पडत नसून शेतकरी हतबल झाले आहे.खेड तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कांद्याची लागवड केली आहे. काही शेतक-यांचे कांदे काढणीसाठी तयार झाले आहे. मात्र बाजार नसल्यामुळे पिकावर नांगर फिरवण्याची वेळ येणार आहे. गेल्यावर्षी कांद्याला चांगला भाव असल्यामुळे यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. एक एकर शेतीत कांदा लावण्यासाठी मशागतीपासून लागवड, खते, फवारणी, कापणी, गोणी भरणी, मजुरी, वाहतूक असा एकूण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. सध्या भाव उतरल्याने उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचे चित्र दिसत आहे.भाव चांगला म्हणून लावला, पण फसलो!गतवर्षी कांदा कांदा उत्पादनातून चांगला फायदा झाल्याने यंदा एक एकरात कांद्याची लागवड केली. यासाठी मशागत, लागवड, खुरपणी, खते असा ८० हजार रुपये खर्च झाला. याशिवाय काढणी कापण्यासाठी आणखी २० हजार रुपयांच्या जवळपास खर्च येणार आहे.त्यामुळे पंधरा दिवसांत कांद्याचा भाव वाढला तरच कापणी करणार नाही तर कांदे तसेच शेतात सोडून देणार, अशी प्रतिक्रिया खेड तालुक्यातील मांजरेवाडी (पिंपळ) येथील शेतकरी मनोहर मांजरे यांनी व्यक्त केली.यंदा चांगला बाजारभाव मिळेल म्हणून कांदा लागवड केली. सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. परंतु, बाजारात कांद्याला चार ते पाच रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे उर्वरित कांदा काढून काहीच उपयोग होणार नाही बाजारभाव नसल्याने कांदा काढणी थांबवली असल्याचे रेटवडी (ता. खेड) येथील शेतकरी दिलीप पवळे यांनी सांगितले....कापणी काढणे न केलेलीच बरीखेड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे काही शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. परंतु सध्या किरकोळ बाजारात पाच ते सहा रुपये किलोने विक्री होत आहे. चाकण बाजारपेठेमध्ये पाच ते सहा रुपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही निघणार नसल्याने कांद्याची काढणी व काढणी करून काही उपयोग होत नसल्याचे दावडी येथील शेतकरी सुरेश डुंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदाagricultureशेती