शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation: ओबीसी आरक्षण; पुण्यातील सर्व पक्ष म्हणतात, हे श्रेय आमचेच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 09:47 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर केल्याने या निर्णयाचे सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे, तर भाजप व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हे श्रेय आमचेच असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आरक्षणाच्या यशाबद्दल पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

श्रेय आमचेच हा सर्वांचा दावा

''सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण मान्य केले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच पाठपुरावा केला असून, महाविकास आघाडीतर्फे एकत्रित सर्वोच्च न्यायालयातील लढाई लढली गेली. बांठिया कमिशन महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणासाठी नेमले होते. या आयोगाकडून सादर करण्यात आलेला वस्तुनिष्ठ अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहित होणार आहेत. - अरविंद शिंदे, अध्यक्ष काँग्रेस''

''ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडीच्या प्रयत्नाचा हा विजय आहे. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असताना, बांठीया समितीने हा सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत अहवाल सादर केला होता. तोच अहवाल न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. महाविकास आघाडीमुळेच ९७ सालापासूनचे ओबीसी आरक्षण कायम राहिले आहे. -  प्रशांत जगताप, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस''

''ओबीसी आरक्षण दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार. या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, सत्ता मिळाल्यावर चार महिन्यांच्या आत ओबीसी आरक्षण मिळवून देऊ. हा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. हे आरक्षण मिळविण्यासाठी फडणवीस यांनी आता न्यायालयात सक्षम बाजू मांडली व त्याला यश आले आहे. - जगदीश मुळीक, अध्यक्ष भाजप''

''ओबीसी आरक्षण मिळणे हे ठाकरे सरकारने नेमलेल्या बांठीया आयोगाचे फलित आहे. ठाकरे सरकारला ओबीसींना आरक्षण द्यावयाचे होते, परंतु केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा राज्याला लवकर दिला नाही. आरक्षणासाठी ओबीसींना वेठीस धरण्यात आले; पण ठाकरे सरकार या आरक्षणाच्या बाजूने कायम राहिले व सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली, त्याचेच हे यश आहे. - संजय मोरे, शहराध्यक्ष शिवसेना''

''ओबीसी आरक्षणामुळे ओबीसी समाजाला अखेर न्याय मिळाला आहे. ओबीसी आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो. या आरक्षणाबाबत कोणीही राजकीय श्रेयवाद करून घेऊ नये. - साईनाथ बाबर, अध्यक्ष मनसे''

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणPuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा