शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक- राजेश शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:26 IST

देशातील पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अवयवदान नाही

तीन वर्षांपूर्वी अवयवदानाविषयी पाच मिनिटांचा माहितीपट तयार केला होता. त्या निर्मितीप्रक्रियेदरम्यान आपल्याकडे अद्यापही अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणावर कामाची गरज असल्याचे निदर्शनास आले. रिबर्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून आता अवयवदान करण्यासाठी प्रचार-प्रसाराकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून नुकतीच त्याची सुरुवात कर्नाटकातील मंगळूर येथून करण्यात आली. सायकल रॅलीतून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. याविषयी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांच्याशी साधलेला संवाद.भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. अद्यापही देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश असे आहेत, की ज्यात अवयवदानविषयक जनजागृती नाही. दरवेळी शासनाला दोष देण्यापेक्षा आपण स्वत:हून आवश्यक ते बदल आत्मसात करण्याविषयी जागरुकता दाखविली पाहिजे.खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवयवदानविषयक मोठ्या प्रमाणात सजगता पाहावयास मिळते. देशातील एकूण अवयवदानाच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात विरोधाभास असल्याचे दिसते. प्रचार अवयवदानाचा या माध्यमातून लोकमानस घडवून त्याचे परिवर्तन अवयवदानात कसे करता येईल, याचा विचार करण्याचे काम फाऊंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत. पुण्यात मागील तीन वर्षांपासून २०० जणांकडून अवयवदान झाले. या आकडेवारीवरून नजर फिरवल्यास आपल्याला अवयवदान व जनजागृती याची कल्पना येईल. मंगळूर येथे नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन, मंगळूर आणि असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यात अनुक्रमे ७५, ५३ आणि १०५ किमी अंतर सायकलिंग करण्यात आली.या सर्वांमागील उद्देश हाच, की अवयवदानचा प्रचार आणि प्रसार. अवयवदानाविषयी महाराष्ट्रातील काही जिल्हयांचा अभ्यास केला असता त्यात रत्नागिरी, अहमदनगर या जिल्हयांमध्ये एकही परवानाधारक अवयवदानाचे रुग्णालय नाही. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रबांधणीच्या मोठ्या गप्पा आपण करीत असलो तरीदेखील प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे मोठी अवघड गोष्ट आहे. याकरिता गरज आहे ती जनमानसाचे वैचारिक प्रबोधन करण्याची. याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातही अवयवदानाचा परवाना नाही. या तुलनेत नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अवयवदानाची जागृती झालेली दिसते. आता सोलापूर, कोल्हापूरमध्ये अवयवदान होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध असताना दुसºया बाजूला अद्यापही अवयवदानाविषयी फारशी माहिती नसल्याचे चित्र दिसून येते. या वास्तवाचा स्वीकार करून आगामी काळात भरीव कामगिरी कशी करता येईल, याचा विचार सर्वांना करावा लागेल. यासाठी केवळ अवयवदानाशी संबंधित संस्था किंवा संघटनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्थेला महाराष्ट्र आरोग्य विभागाने आपला हेल्पलाईन क्रमांक दिला. त्या माध्यमातून संस्थेचा उत्साह वाढून अवयवदानाविषयी काम करण्याचे मनोबल वाढण्यास मदत झाली. सोशल माध्यमांचा उपयोग याकामी करता येऊ लागला. यूट्यूबवर अवयवदानाविषयीची माहिती अपलोड करून सबंध जगभरात पोहोचता येत आहे. अवयवदान ही चळवळ व्हावी याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न झाल्यास त्याचा उपयोग सर्वांनाच होईल. अवयवदानाबाबत जगातील इतर प्रगत देशांची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला आणखी मोठी मजल मारायची आहे, याची कल्पना येईल.

टॅग्स :Organ donationअवयव दानPuneपुणे