शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:15 IST

वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे

बारामती : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ३० जूननंतर होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भवानीनगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी पुढे म्हटले की, ३० जूननंतरच कर्जमाफी होईल कारण या वर्षी सरकारवर मोठा आर्थिक भार पडला आहे. जरी जाहीरनाम्यात शब्द दिला असला तरी सरकारने हा निर्णय घेतला आहे; पण हे प्रत्येक वेळी होणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे. "यात आम्हाला राजकारण करायचे नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली.

राज्याच्या ८ लाख कोटी उत्पन्नापैकी ४ लाख कोटी शासकीय पगार आणि निवृत्ती वेतन यावर खर्च होतात. लाडक्या बहिणींना ४५ हजार कोटी जाते आणि २५ कोटी महावितरणला द्यावे लागतात. या वेगवेगळ्या योजनांसह एकूण १ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. मी भाषणात सांगितले की सगळा पैसा खर्च होतो; पैशाचे कुठलेही फुकट काम होत नाही, यावरून माझ्यावर टीका केली जाते. काहींनी तर पुरुष असूनही लाडक्या बहिणींचा लाभ घेतल्याचा आरोप पवार यांनी केला. ज्याला गरज आहे त्याच्या खात्यात पैसे दिले पाहिजेत, हेच काळाची गरज आहे, असे पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer loan waiver implementation after June 30th, not every time.

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar announced farmer loan waivers post-June 30th due to financial burdens. He emphasized financial discipline for farmers, highlighting substantial government expenses on salaries, pensions, and welfare schemes. Pawar defended his statements on fund allocation against criticism.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाBachhu Kaduबच्चू कडू