शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:13 IST

आता, अजित पवारांना याच विधानावरुन शरद पवार गटाने चॅलेंज दिले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादीतील बंडानंतर शिरुर मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. कोल्हे यांनी जाहीर भाषणातून आपली भूमिका मांडली असून आता शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला लक्ष्य करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हेंना इशाराच दिला होता. यंदाच्या, निवडणुकीत त्यांना पाडणारच, असं अजित पवार म्हणाले. तर, दिलीप वळसे पाटील आणि मी जीवाचं रान केल्यामुळेच ते शिरुरमधून निवडून आले, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, अजित पवारांना याच विधानावरुन शरद पवार गटाने चॅलेंज दिले आहे. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि अजित पवार यांना प्रत्युत्तरही दिलं. "शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे. मी आहे तिथेच आहे, मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे," अशा शब्दांत कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला. आता, शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लावंडे यांनी अजित पवारांनाच चॅलेंज दिले आहे. 

राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रवक्ते विलास लावंडे यांनी अजित पवारांना थेट चॅलेंज दिले. अमोल कोल्हेंविरुद्ध तुम्हाला उमेदवार मिळेना, म्हणून तुम्ही याला-त्याला काड्या करतात. दिलीप वळसे पाटील यांना तुम्ही शिरुर मतदारसंघातून उभे करा. कारण, तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग, आता दिलीप वळसे पाटील यांनाच उभे करा बघू काय होतंय? कुणाचा गाडा ११ सेकंदाचा आहे ते, असे आव्हानच शरद पवार गटाकडून अजित पवारांना देण्यात आले. तसेच, पार्थ पवार यांना मावळमधून तुम्ही निवडून आणा, पार्थ पवार यांना पुन्हा एकदा मावळमध्ये उभं करा आणि निवडून आणा. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. दिल्लीत तुमचा वट आहे, मग कांद्याचा प्रश्न सोडवा, आमच्या २० हजार मुली गायब आहेत, तो प्रश्न सोडवा. साक्षी मलिकचे अश्रू पुसायला रुपाली चाकणकरांना पाठवा ना, असा घणाघात विलास लावंडे यांनी अजित पवारांवर केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुर