शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

विमा कंपन्यांचे ‘नो ’आरोग्यम् धनसंपदा! ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 11:58 IST

हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कॅशलेस सुविधा बंद झाल्याचे समजणे...उपचारानंतर शक्य तितक्या कमी क्लेमचा दावा मंजुर करणे... असा ग्राहक म्हणून जर तुम्हाला अनुभव आला असेल..

ठळक मुद्देतांत्रिक कारणावरुन विमा क्लेम नाकारतायेत अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेकडे गेल्या वर्षभरात ग्राहकांनी ६५० तक्रारी दाखल

पुणे : विमा कंपन्यांनी नेमलेल्या थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (टीपीए) कंपन्यांकडून ग्राहकांना दिली जाणारी भयंकर वागणूक...हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कॅशलेस सुविधा बंद झाल्याचे समजणे...उपचारानंतर शक्य तितक्या कमी क्लेमचा दावा मंजुर करणे...असा ग्राहक म्हणून जर तुम्हाला अनुभव आला असेल , तर तुम्ही एकटे नाहीत. ग्राहक पंचायतीकडे वर्षभरात दाखल झालेल्या साडेसहाशे तक्रारींपैकी तब्बल ३० टक्के तक्रारी या मेडिक्लेम आणि मनी बॅक पॉलिसी धारकांच्या आहेत.अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेकडे गेल्या वर्षभरात ग्राहकांनी ६५० तक्रारी दाखल केल्या. त्या पैकी सर्वात जास्त तक्रारी या विमा क्षेत्राशी संबंधित आहेत. यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधातील तक्रारींचा वाटा अधिक होता. आजही त्यांच्या विरोधातील तक्रारींचे प्रमाण कमी झालेले नाही. अजूनही एकूण तक्रारींपैकी ३० टक्के तक्रारी बांधकाम व्यावसायिकांच्या आहेत. मात्र, त्यांच्या बरोबरीला आता विमा क्षेत्र देखील वेगाने पुढे आले आहे.  टेलिकॉम कंपन्या, ग्राहकांची वजन मापामध्ये होणारी लूट अशा विविध तक्रारींची संख्या देखील लक्षणीय आहे. याबाबत माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर म्हणाले, ग्राहकाला विमा देताना चुकीची आश्वासने दिली जातात. अनेकदा तुम्हाला केवळ ३ वर्षे अथवा हप्ते भरा व नंतर हप्ते भरू नका असे खोटे आश्वासन एजंट लोक देतात. कॅशलेस कार्ड असूनही, ग्राहकांना पैसे भरावे लागतात. वाटेल ती शुल्लक कारणे शोधून क्लेम नाकारला जात आहे. कॅशलेस कार्ड असूनही काहीना काही कारण काढून आधी पैसे भरायला भाग पाडले जाते. नंतर बिलाची रक्कम देताना त्रुटी काढल्या जातात. त्यात तुम्हाला आधीच आजाराची लक्षणे होती, हे कारण जास्त दिले जाते. विशेष म्हणजे,विमाधारकाला देखील रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच आपल्याचा संबंधित आजार झाल्याचे समजलेले असते. ग्राहकांनी दावा दाखल केल्यानंतर ९० दिवसांत न्याय मिळाला पाहिजे. मात्र, ग्राहकाचा दावा सुनावणीला यायलाच तितका कालावधी लागतो. जिल्हा ग्राहक न्यायमंचापासून ते राष्ट्रीय न्यायमंचापर्यंत ग्राहकाला जावे लागते. यात पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतरही राष्ट्रीय मंचाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे सागर म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल