शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 23:00 IST

जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

ठळक मुद्देपाणी वितरणाचे नियोजन,गळती रोखणे,पुनर्वापरावर भर गरजेचाएका व्यक्तीने दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षितलोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर

पुणे: महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरत आहे. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र, पुढील वीस वर्षांनंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.त्यामुळे पाणी वितरणाचे योग्य नियोजन,पाण्याची गळती व चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.एका व्यक्तीने अंघोळ,बाथरूम,पिण्याचे पाणी, कपडे, भांडे धुण्यासाठी दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून या नियमाच्या आधारेच पाणी मंजूर केले जाते. पुणे महापालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार पालिकेने दररोज ६३५ दशलक्ष घन मिटर (एमएलडी) पाणी वापरावे अशी अपेक्षा आहे.मात्र,पालिकेकडून १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या,पालिका हद्दीत समाविष्ट होणा-या गावांची संख्या आणि तर ती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असून वाढी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी पालिकेला एक कोटी लोकसंख्येचा आकडा दाखवता येणार नाही.पालिकेने सप्टेबर २०१७ मध्ये जलसंपदा विभागाला सादर केलेल्या दिलेल्या शपथपत्रामध्ये शहराची लोकसंख्या २०३२ पर्यंत ५२ लाख ७१ लाख होईल,असे नमूद केले होते. त्यावर पालिकेला २०३२ मध्ये १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे होईल,असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र,पालिकेकडून तब्बल १७ टीएमसी पाण्याची मागणी केली जात आहे.परंतु, जुलै २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पालिकेने एकाही महिन्यात सरासरी १३०० ते १३५० एमएलडी पेक्षा कमी पाणी वापरले नाही. त्यामुळे पालिकेकडून नहेमीच मंजूर पाण्याच्या दुप्पटच पाणी वापर होत असल्याचे दिसून येते.परिणामी पालिकेला मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवावी लागणार आहे.त्यासाठी पालिकेने शहरातील जलवाहिन्यातून होणारी पाण्याची चोरी व गळती थांबविणे गरजेचे आहे. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देवून त्याची क्षमता वाढवणे,पाण्याचे वितरण योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.------------------पुणे महापालिकेला मंजूर झालेल्या पाण्यात पुणे शहराची तहान भागवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे वितरण नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवण्याचे ठरवले तर पाणी कमी पडणार नाही.मात्र,नियोजनाकडेच दूर्लक्ष होत आहे.- सुरेश शिर्के ,माजी सचिव,जलसंपदा विभाग

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका