शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 23:00 IST

जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

ठळक मुद्देपाणी वितरणाचे नियोजन,गळती रोखणे,पुनर्वापरावर भर गरजेचाएका व्यक्तीने दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षितलोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर

पुणे: महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरत आहे. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र, पुढील वीस वर्षांनंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.त्यामुळे पाणी वितरणाचे योग्य नियोजन,पाण्याची गळती व चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.एका व्यक्तीने अंघोळ,बाथरूम,पिण्याचे पाणी, कपडे, भांडे धुण्यासाठी दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून या नियमाच्या आधारेच पाणी मंजूर केले जाते. पुणे महापालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार पालिकेने दररोज ६३५ दशलक्ष घन मिटर (एमएलडी) पाणी वापरावे अशी अपेक्षा आहे.मात्र,पालिकेकडून १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या,पालिका हद्दीत समाविष्ट होणा-या गावांची संख्या आणि तर ती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असून वाढी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी पालिकेला एक कोटी लोकसंख्येचा आकडा दाखवता येणार नाही.पालिकेने सप्टेबर २०१७ मध्ये जलसंपदा विभागाला सादर केलेल्या दिलेल्या शपथपत्रामध्ये शहराची लोकसंख्या २०३२ पर्यंत ५२ लाख ७१ लाख होईल,असे नमूद केले होते. त्यावर पालिकेला २०३२ मध्ये १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे होईल,असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र,पालिकेकडून तब्बल १७ टीएमसी पाण्याची मागणी केली जात आहे.परंतु, जुलै २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पालिकेने एकाही महिन्यात सरासरी १३०० ते १३५० एमएलडी पेक्षा कमी पाणी वापरले नाही. त्यामुळे पालिकेकडून नहेमीच मंजूर पाण्याच्या दुप्पटच पाणी वापर होत असल्याचे दिसून येते.परिणामी पालिकेला मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवावी लागणार आहे.त्यासाठी पालिकेने शहरातील जलवाहिन्यातून होणारी पाण्याची चोरी व गळती थांबविणे गरजेचे आहे. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देवून त्याची क्षमता वाढवणे,पाण्याचे वितरण योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.------------------पुणे महापालिकेला मंजूर झालेल्या पाण्यात पुणे शहराची तहान भागवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे वितरण नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवण्याचे ठरवले तर पाणी कमी पडणार नाही.मात्र,नियोजनाकडेच दूर्लक्ष होत आहे.- सुरेश शिर्के ,माजी सचिव,जलसंपदा विभाग

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका