शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगरसाठी नवीन पाणीयोजना

By admin | Updated: October 9, 2016 04:15 IST

शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा २७ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

राजगुरुनगर : शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा २७ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. कडूस प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसह शहरातल्या वितरण व्यवस्थेचा त्यात समावेश आहे. चासकमान धरणाचा पाणीसाठा हा उद्भव धरून हा अहवाल बनविण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली. पूर्वीची कडूस प्रादेशिक योजना राजगुरुनगरकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे चासकमान धरणातून पाणी उचलून वेताळे गावाच्या टेकडीवर बसविलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून नैसर्गिक उताराने ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. पण, वीजबिल भरता न आल्यामुळे आणि अन्य काही कारणांनी ती योजना बंद पडली होती. आता त्या योजनेच्या राजगुरुनगरपर्यंतच्या जलवाहिन्या दुरुस्ती, आवश्यक तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची आणि अन्य यंत्रणेची दुरुस्ती या कामांचा समावेश या सविस्तर प्रकल्प अहवालात करण्यात आला आहे. या योजनेचे पाणी गावात वितरित करण्यासाठी ६२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे गावात टाकण्याची तरतूद अहवालात केली आहे. या जलवाहिन्या उच्च घनतेच्या पॉलिथिनच्या असणार आहेत. त्यांना छिद्र पाडून कोणालाही सहज पाणी घेणे शक्य होणार नाही. फक्त नगर परिषदच यंत्राद्वारे पाणीजोड देऊ शकेल, अशी यात तरतूद आहे. तसेच ३५ लाख लिटर क्षमतेच्या पाच नवीन टाक्या उभारण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)नागरिकांना २४ तास पाणी या योजनेतून नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, अशा प्रकारे नियोजन केले आहे. दर दिवशी दरडोई १३५ लिटर पाणी वापरात येईल, असे अहवालात गृहीत धरले आहे. वेताळे गावाच्या उंच टेकडीवरून पाणी येणार असल्याने ते पुरेशा दाबाने ८ मीटर ते २५ मीटर उंचीपर्यंत मिळू शकणार आहे, अशी माहिती हा अहवाल बनविणाऱ्या ग्राफीकॅड सिस्टिम कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजू रत्नपारखी यांनी दिली. पाण्याचा उद्भव चासकमान धरण असल्याने पाण्यात मधल्या गावांचे आणि राजगुरुनगरचे अशुद्ध पाणी मिसळण्याचा प्रश्न राहणार नाही, असे ते म्हणाले.राजगुरुनगरसाठी नवीन पाणीपुरवठा योजना करण्याबाबत ग्रामपंचायत असल्यापासून वेगवेगळे प्रस्ताव विचाराधीन होते. या ना त्या कारणाने ते प्रस्ताव मागे पडत गेले आणि नवीन पाणीयोजना अद्याप झालेली नाही. अगदी मंत्रालयस्तरावर निर्णय होऊनही पाणीयोजना झालीच नाही. राजगुरुनगरकरांच्या वाट्याला नेहमीच अशुद्ध पाणी आले. यामुळे पिण्याचे पाणी गेले अनेक वर्षे नागरिक विकत घेत आहेत. या वर्षीच्या मध्यावर ८८ लाख रुपये खर्च करून जिल्हा नगरोत्थान योजनेतून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना असून, नवीन पाणीपुरवठा योजना गरजेची आहे. म्हणून नगर परिषदेने हा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केला आहे आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राज्य नगरोत्थान योजनेतून त्याला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.