शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 14:21 IST

पोलिसांकडून कारवाई ऐवजी चार-पाच हजार घेऊन केली जाते मांडवली...

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत.  परंतु आज ही ग्रामीण भागात लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू असून, दारापुढे मंडप टाकून करण्यात येत असलेल्या लग्नात सर्रास 300-500 व-हाडी हजेरी लावत आहे. याकडे पोलिस मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, कारवाई करण्याऐवजी केवळ चार- पाच हजार रुपयांची माडवली करून शेकडोंच्या उपस्थितीला एक प्रकारे  संहमतीच देत आहेत. 

गेल्या एक महिन्यात शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेकच झाला आहे. दोन-तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने आता तब्बल बारा हजारांचा टप्पा क्रॉस केला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात ग्रामीण भागात लग्न समारंभ व दशक्रिया विधीमध्ये शेकडो , हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असल्याचे लक्षात आल्यावर यावर देखील कडक निर्बंध घालत लग्नांसाठी  50 तर दशक्रिया विधीसाठी 20 लोकांची अट घातली आहे गेल्या एक वर्षांपासून ही अट लागू असली तरी लोक काही केल्या ऐकत नसून आजही ग्रामीण भागात लग्नासाठी 300-500 पट्टीत लोक उपस्थित राहतात. यामध्ये केवळ लग्न एखाद्या हाॅल मध्ये न करता नवरा किंवा नवरीच्या घरा समोर मंडप टाकून लग्न समारंभ अत्यंत धुमधडाक्यात केले जात आहे. 

जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दारापुढे लग्नाचा नवीन फंडा सुरू झाला आहे. परंतु या दारा पुढच्या लग्नात वऱ्हाड्यांच्या उपस्थितीकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. काही गावांत पोलिस कारवाईला जातात देखील पण केवळ चार-पाच हजार रुपयांची वसुली करून हजारोंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब जिल्ह्यात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरambegaonआंबेगावMancharमंचरKhedखेडmarriageलग्नPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस