शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नवले पूल अपघात: ‘लोकमत’कडून राजकीय पदाधिकाऱ्यांना ३ वर्षांपूर्वी सुचवण्यात आले होते 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:25 IST

दरवेळी रस्त्याच्या बाबतीत एनएचएआय, महापालिका, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत पोलिसांनी बोलून दाखवली

पुणे : नवले पूल परिसरात वारंवार होणारे अपघात थांबविण्यासाठी स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, पोलिस आणि आरटीओ अधिकारी यांच्यासोबत ‘लोकमत’च्या वतीने ‘लोक दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे तत्कालीन व्यवस्थापक यांनादेखील सहभागी करून घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून, नंतर एनएचएआयने केंद्रीय पातळीवर निर्णय होतात, असे म्हणत ठोस उपाययोजना करण्याचे टाळले.

९ डिसेंबर २०२२ रोजी सुचविलेले प्रमुख पर्याय...

१) कात्रज बोगद्याच्या बाहेर चेक पोस्ट उभारावा.२) चेक पोस्टजवळ प्रत्येक अवजड वाहनांचे फिटनेस तपासले जावे.३) चालकाने मद्यपान केले आहे की नाही त्याची तपासणी व्हावी.४) जांभुळवाडी दरीपूल संपताच तेथील वळणार पोलिस चौकी उभारण्यात यावी.५) स्वामी नारायण मंदिराच्या पुलाजवळ वाहनांच्या वेगाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड असावेत.६) याच ठिकाणी स्पीड गन आणि कॅमेरा असणे गरजेचे.७) स्वामी नारायण मंदिरापासून ते नऱ्हे सेल्फी पॉईंटसमोर असलेल्या रस्त्यावर झिकझॅक बॅरिकेट्स असावेत.(गुरुवारी झालेला अपघात याच ठिकाणी झाला. बॅरिकेट्स असते तर जीवितहानी झाली नसती.)८) जड वाहनांसाठी मधली लेन राखीव असावी व तेथे जड वाहनांचे व वेग मर्यादेचे स्टिकर्स लावले जावे. त्यामुळे वाहनचालक सावध होतील.९) कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत सीसीटीव्ही लावावेत आणि मोठ्या अक्षरात सीसीटीव्हीचे फलक लावावेत.१०) परिसरात रात्रीच्या वेळी लाईट्स असणे आवश्यक.

...तर वाचले असते जीव

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून १५ दिवसांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ला पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात पोलिसांनी नवीन कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यावर नवले पूलापर्यंत लख्ख प्रकाश देणारे लाईट्स आणि रम्बलर टाकण्यासंदर्भात सांगितले होते. जर हे लाईट्स आणि रम्बलर असते तर कदाचित हा अपघात टळला असता. मात्र, आजपर्यंत एनएचएआयने काहीही केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासह दरवेळी रस्त्याच्या बाबतीत एनएचएआय, महापालिका, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत पोलिसांनी बोलून दाखवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Navale Bridge Accident: Lokmat Suggested Solutions Three Years Ago

Web Summary : Lokmat proposed solutions three years ago to prevent Navale Bridge accidents, including check posts, fitness checks, speed monitoring, and better lighting. Authorities failed to implement these, potentially preventing recent tragedies. Police cited inter-departmental blame for inaction.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPMRDAपीएमआरडीएPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका