शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

National Youth Day Special :चार हजार रोपांचा ‘जीव’ वाचवणारा ‘संरक्षक’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 8:02 AM

गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत.

श्रीकिशन काळे 

पुणे : गेल्या वर्षी चौदा हजार रोपे लावली. त्यातली आता मोठ्या कष्टाने चार हजार वाचली आहेत. त्यांना काय बी करून मी वाचविणार आहे. यंदा पाऊसच कमी पडल्याने लय हाल होत आहेत. पण जेवढी रोपे जगवता येतील, तेवढी मी जगविण्याचा प्रयत्न करतोय, या भावना आहेत एका तरूण वन विभागातील गार्डच्या. ३१ वर्षीय वनरक्षक रोहन दत्तात्रेय इंगवळे असे त्याचे नाव असून, तो या रोपांनी जगावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. 

          पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डाळज येथील वन परिसरात तो काम करीत आहे. वन विभागातर्फे १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यात आली. परंतु, अनेक रोपे पाण्याविना जळून गेली आहेत. बरीच रोपे प्राण्यांमुळे मोडली आहेत. इंदापूर तालुक्यातील डाळज वन परिसरात गेल्या वर्षी सुमारे १४ हजार रोपे लावली. या रोपांना पाणी देण्याचे काम फॉरेस्ट गार्ड रोहन इंगवळे करीत आहेत. ते म्हणाले,‘‘सध्या पाण्याची खूप टंचाई आहे. आठवड्यातून तीन दिवस पाणी देण्यासाठी वेळ मिळतो. ’’ दरम्यान, परसवाडी वन विभागात गार्ड तानाजी रमेश पिचड आणि शिर्सफळ वन विभागात प्रतिक्षा सुभाष खोमणे देखील अशाच प्रकारची मेहनत घेत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले. 

आठवड्यातून तीन दिवसच पाणी...

          उजनी धरणातून जी पाइपलाइन पुढे सोलापूरकडील गावांसाठी गेली आहे, त्या पाइपलाइनला वन परिसरात चार ठिकाणी व्हॉल्व लावले आहेत. त्या व्हॉल्वमधून झाडांना पाणी दिले जाते. परंतु, आठवड्यातून तीनच दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे तीनच दिवस झाडांना पाणी द्यावे लागते. एका रोपाला महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिले तरी चालते. त्यामुळे तीन दिवसांत काही झाडांना पाणी दिल्यानंतर दुसºया आठवड्यात इतर झाडांना देतो. व्हॉल्वपासून दूर असणाºया झाडांना आता बाटली लावून पाणी देणार आहे. त्यासाठी बाटल्या जमा करीत असल्याचे इंगवळे यांनी सांगितले.  

पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही

     डाळजला पूर्वी टॅँकरने पाणी दिले जात होते. परंतु, ते बंद झाले आहे. त्यामुळे आता आम्हालाच पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पाणी नसल्याने रोपे जळून जात आहेत. आता ४ हजारच्या जवळपास रोपे जीवंत आहेत. रोपे जळाली की वाईट वाटतं. पण पाणीच नसल्याने काहीच करू शकत नाही. 

- आर. डी. इंगवळे, फॉरेस्ट गार्ड, डाळज वन विभाग  

टॅग्स :environmentवातावरणdroughtदुष्काळ