शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

पुणे, पिंपरी- चिंचवडसाठी मुळशी धरणाचे पाणी हाच एकमेव पर्याय : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 9:19 PM

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज

ठळक मुद्देशहर, जिल्ह्यात धरणासाठी एकही साईट शिल्लक नाही

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज देखील वाढत आहेत. परंतु यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र धरण बांधण्यासाठी एकही साईट शिल्लक नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टाटाचे मुळशी धरण हाच एक पर्याय असून, या संदर्भांत चर्चा सुरु असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.     पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचा सन २०२०-२१ या वर्षांचा जिल्हा नियोजना संदर्भांत आढावा बैठक सोमवारी (दि.२७) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाता उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, पाण्यावर होणार खर्च लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र धरण बांधलेले परवडेल. याबाबत पवार  म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात काम करतोय. पण पुणे जिल्ह्यात धरणासाठी एकही साईड शिल्लक नाही. त्यामुळे नवे धरण बांधणे शक्यच नाही. यासाठी केवळ मुळशी धरणाचा पर्याय आहे. परंतु या धरणाच्या पाण्यावर प्रामुख्याने वीज निर्मिती केली जाते. शासनाने पाण्या संदर्भांत धोरण निश्चित आहे. यामध्ये प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, नंतर शेती आणि नंतर औद्योगिक वापरासाठी आहे. यामुळे मुळशी धरणातील पाणी शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरता येऊ शकते, असे पवार यांनी येथे सांगितले.     दरम्यान कृष्णा खोरे तंटा लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पाणी वाटप केले जाते. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांसाठी पाणी वाटपाचे सूत्र ठरले आहे. सध्या धरण बांधण्यासाठी एक ही साईट शिल्लक राहिली नाही. मुळशी धरण हे टाटांनी वीजनिर्मितीसाठी बांधले आहे. त्यातून वीजनिर्मिती केली जाते. पीक- अव्हर्समध्ये वीजनिर्मिती करण्यात यावी. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी सौर उर्जा, पवन उर्जा आणि अणुउर्जा यांचा वापर वाढविण्यात यावा.  यामुळे भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला मुळशी धरणातून पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ----------------मेट्रो, एचसीएमटीआर लोकांचे हित लक्षात घेऊन निर्णयपुणे शहरातील प्रस्तावित वाढीव मेट्रो मार्ग आणि एचसीएमटीआर प्रकल्प राबविताना केवळ लोकांचे हित आणि पुढील ५० वर्षांचा शहराचा विकास लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात येतील. यामध्ये कोणत्याही स्वरुपांचा राजकारण केले जणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचा पांठिबा आणि काँगे्रसचा विरोध किंवा अन्य एखाद्या पक्षाची भूमिकांडे लक्ष दिले जाणार नाही. शहर आणि जिल्ह्यामध्ये कोणतेही प्रकल्प राबविताना नागरिकांचे हित, शहराची गरज लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ सल्लागारांचे विचार घेऊनच राबविण्यात येईल, असे स्पष्ट मत पालकमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका