शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 21:31 IST

भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली...

ठळक मुद्देमहापालिकेचे अधिकारी उपस्थित : प्रकल्पग्रस्तांकडून झाला नाही विरोधपोलिसी कारवाईचा उगारला बडगास्थानिक शेतकऱ्यांकडून निषेध

पुणे : पुण्याच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने भामा आसखेड धरणामधूनपाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या जवळपास सव्वाशे जवानांना तैनात करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्रीच दहा प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे शुक्रवारी हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु झाले. महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे. या योजनेमधून शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव. धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्ष स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. जमिनीच्या बदल्यात जमीन अशी शेतकºयांची मागणी होती. शासनाने हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विरोध सुरुच ठेवला होता. पालिकेने नुकतेच मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी ५ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. प्रकल्पाचे काम आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी १८५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

शुक्रवारी बरेच दिवस बंद असलेले काम पालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उपसण्याचे आणि पंप बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. यावेळी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुहास कुलकर्णी यांच्यासह आणखी अधिकारी उपस्थित होते. कामाला सुरुवात झाली असली तरी या कामामध्ये खंड पडू न देणे आणि शेतकऱ्यांसोबत संवादामधून मार्ग काढण्याचे आव्हान असणार आहे. ====पोलिसी कारवाईचा उगारला बडगापालिकेला प्रकल्पाचे काम सुरु करावयाचे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्रीच दहा प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. कलम १५१ (३) नुसार त्यांच्यावर कारवाई करीत शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्याकडून प्रकल्पाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही असे हमीपत्र घेतले. त्या हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी दिवसभरामध्ये ४८ जणांना कलम १५९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी धरणापासून तीन किलोमीटरपर्यंत कलम १४४ लागू करीत १४ दिवसांसाठी जमावबंदी घोषित केली आहे. ====स्थानिक शेतकऱ्यांकडून निषेधप्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले असून काहीजणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या. यामुळे पोलिसांचा वापर करुन दडपशाही सुरु असल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीब्र नाराजी व्यक्त करीत पोलीस व प्रशासनाचा निषेध केला. ====पोलिसांचा तगडा बंदोबस्तप्रकल्पाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह दोन सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, १६ सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक यांच्यासह १८५ पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाचे १०० जवान तैनात करण्यात आले होते. ====मागच्या वेळी झालेल्या आंदोलनादरम्यान, एका प्रकल्पग्रस्त शेतकºयाने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळी खबरदारीचा उपाय आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आम्ही हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. - स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीDamधरणFarmerशेतकरी