शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आठवणी पानशेत पुराच्या ! तो भयंकर दिवस आणि उध्वस्त शहर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 3:25 PM

पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.

पुणे : पानशेत धरण फुटून झालेल्या अपरिमित हानीला आज ६७वर्षे उलटली आहेत. पण अजूनही तो भयंकर दिवस आणि त्या काळरात्रीच्या आठवणी अनेक पुणेकरांच्या अंगावर काटा आणतात.१२ जुलै, १९६१ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते.आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात होता तो अंधार, चिखल आणि उध्वस्त झालेल्या संसाराचे उरलेले अवशेष.या प्रलयातून पुणेकर सावरले पण त्याच्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. 

        निर्मला केळकर म्हणाल्या की, मी १२ तारखेला पुण्यात नव्हते पण १४ तारखेला आले तेव्हा मात्र धक्का बसला.जे शहर आम्ही बघितले होते त्याचा लवलेशही शिल्लक नव्हता.आम्ही डेक्कन जिमखान्यावर माडीवर राहत होतो. त्यामुळे अनेक कुटूंबांनी आमच्या घरात आसरा घेतला होता.बाहेर तर फक्त चिखल आणि पाणीच दिसत होतं. जवळपास सात ते आठ दिवस आमच्याकडे अनेक जण राहायला होते.

       आनंद सराफ म्हणाले की, पूर आला तेव्हा आम्ही लहान होतो. ही बातमी समजल्यावर माझे आजोबा तातडीने पुण्याला आले. मंडईतल्या आमच्या घरच्या घरी सर्व नातवंडांना घेऊन त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिलेली आठवण अजूनही आठवतेय. पुण्याचा चेहरामोहरा या घटनेने बदलून गेला होता. पूर्वी शहराबाहेर असणारी पर्वती शहराच्या केंद्रस्थानी आली.

  शशीधर भावे म्हणाले की, त्याकाळी लकडी पुलाला पाणी येणे यात काही नावीन्य नव्हते. पण त्या दिवशी छातीपर्यंत पाणी वाढले आणि हे काहीतरी वेगळे असल्याचे जाणीव आम्हाला झाली.बघता बघता आमचे दुमजली घर या पुरात कोसळले.आमच्या लॉन्ड्रीच्या मशीन तर ओंकारेश्वरपासून वाहत वाहत काँग्रेस भवनपर्यंत गेल्या होत्या. ते सारे रुळावर येईपर्यंत मोठा कालावधी गेला पण आज इतक्या वर्षांनंतरही तो दिवस विसरणे कठीण आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस