शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Bhimashankar Forest: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात; भीमाशंकर अभयारण्याचा महत्वपूर्ण निर्णय

By श्रीकिशन काळे | Updated: July 1, 2024 20:14 IST

लोणावळ्यातून एक कुटुंब वाहून गेले तर आज पुन्हा एक तरुण धबधब्याखाली उडी मारल्याने वाहून गेला

पुणे: पावसाळी पर्यटन करताना अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ताम्हिणीनंतर भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० सप्टेंबर पर्यंत असणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी दिली.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर अपघात होण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागातर्फे १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पायावाटा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. भीमाशंकर अभयारण्यात धबधबे आहेत. त्या कुंडांमधील पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज पर्यटकांना येत नाही. त्यामुळे ते वाहून जाऊ शकतात. म्हणून कोंढवळ धबधबा-जाणारे सर्व मार्ग बंद, चोंडीचा धबधबा-खोपीवली क्षेत्र, न्हाणीचा धबधबा-पदरवाडीजवळ, सुभेदार धबधबा-नारीवाली क्षेत्र, घोंगळ घाट नाला-खांडस ते भीमाशंकर मार्ग, शिडी घाट-पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, सोमवारी पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे की, ज्यामध्ये एका धबधब्याखाली एक तरूण उडी मारत आहे. त्याने पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला नीट पाेहता आले नाही. त्यामुळे तो थेट वाहत पुढे गेला. त्याला कोणालाही वाचवता आले नाही. अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने वन विभागाने धबधबा ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. 

सध्या धबधब्यांच्या ठिकाणी प्रचंड पाऊस होत आहे. अपघाताचा धोका वाढल्याने आम्ही धबधबे बंद करत आहोत. ताम्हिणीसह भीमाशंकर अभयारण्य देखील बंद केले आहे. त्या ठिकाणी अवैधरित्या कोणी गेले तर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल. - तूषार चव्हाण, उपवनसंरक्षक (वन्यजीव), पुणे

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरforestजंगलRainपाऊसPoliceपोलिसenvironmentपर्यावरण