शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आंबा पिकवा केमिकल फ्री ; अन्यथा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:49 IST

एप्रिल महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खाण्यास ग्राहक सुरुवात करतात...

ठळक मुद्दे   अन्न व औषध प्रशासन आणि आडते असोसिएशनच्यावतीने आंबा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटक हापूस, बेगमपल्ली अशा अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठीदरवर्षी आंब्यांचा हंगाम सुरु होताना ग्राहकांकडून चांगला दर मिळतो असा विक्रेत्याचा अनुभव

पुणे : एप्रिल महिना सुरु झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येतो. परंतु गेल्या काही वर्षांत आंबा विक्रेते व शेतकऱ्यांकडून आंबा पिकविण्यासाठी मानवी शरीराला हानिकारक रसायनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अन्न व औषध प्रशासनाने मार्केट यार्डांतील आंबा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेतले. कायद्याने बंदी घातलेल्या कोणत्याही रसायनांचा वापर करणा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.     अन्न व औषध प्रशासन आणि आडते असोसिएशनच्यावतीने आंबा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एप्रिल महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खाण्यास ग्राहक सुरुवात करतात. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटक हापूस, बेगमपल्ली अशा अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठी येतात. दर वर्षी आंब्यांचा हंगाम सुरु होताना ग्राहकांकडून चांगला दर मिळतो असा विक्रेत्याचा अनुभव आहे. यामुळे विक्रेत्यांकडून स्वस्तातला कच्चा माला रसायनांचा वापर करून विकला जातो. ग्राहक देखील महागाचे आंबे विकत घेतात. रसायनांचा वापर केलेली फळे आरोग्यास किती अपायकारक याचा विचार केला जात नाही.  रसायनांचा परिणाम पोटाच्या आतड्यांवर आणि किडनीवर होत असतो. फळांमधली जीवनसत्वे रायायनिक पदाथामुर्ळे नष्ट होऊन जातात. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतडयावर रसायनांचा जास्त परिणाम होतो. रायानिक औषधांमध्ये साठवून ठेवलेली फळे पाण्यात टाकल्यानंतर शरीरातली हाडे ठिसून करणारे फॉस्फेरिक  अ‍ॅसिड तयार होते, असे सांगण्यात आले. ---------कॅल्शियम कार्बाईड पूर्ण बंदी या कॅल्शियम औषधांपासून अ‍ॅसिटीलीन नावाचा वायू तयार होतो.या वायूचा परिणाम थेट मानवाच्या मेंदूवरच होतो. लवकर पिकविलेली फळे खाल्यावर ताप, मळमळ, उलट्या, जुलाब आदी परिणाम होतात. यामुळे कॅल्शीयम कार्बाईडला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायद्यात बदल करून इथेपॉन हा रासायनिक पदार्थ फळे पिकविण्यासाठी वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. इथेलॉन गॅस पावडर स्वरुपात फळांच्या प्रत्यक्ष संर्पकात न आणता पाकिटात वापरुन फळे पिकविण्यासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे कायद्यानुसार परवानगी असलेल्या औषधांचाच वापर करून फळे पिकवणे आवश्यक आहे. - उ.वि.इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी---------------ग्राहकांच्या हितासाठी आडते  असोसिएशनचा उपक्रमएप्रिल महिन्यांपासून रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. आंब्यांचा हंगाम सुरु झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई  सुरु केली जाते. यामध्ये काही विक्रेते सापडल्यावर त्याचा परिणाम संपूर्ण आंबा मार्केटवर होतो.  ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आंबा पिकविण्यासाठी रासायनिक  औषधांचा वापर टाळण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले. - रोहन उरसळ, आंबे विक्रेते व आडते असोसिएशनचे सचिव

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाFarmerशेतकरी