शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

माळीणची पुनरावृत्ती भाेरमध्ये थाेडक्यात टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:24 IST

भाेर येथे माळीण सारखी घटना थाेडक्यात टळली आहे. कोंढरी गावातील डोंगराला भेगा पडुन संपुर्ण कडा, दगड, गोटे झाडे, बांबु मातीसह वाहुन येथील घरांजवळ आले.

भोर :  तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंढरी गावातील डोंगराला भेगा पडुन संपुर्ण कडा, दगड, गोटे झाडे, बांबु मातीसह वाहुन येथील घरांजवळ आले. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत भात पिके, बांबु, झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडुन ५ घरातील नागरीकांना बाहेर काढुन स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, गावातील इतर घरांनाही धोका असल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण असून संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

भोर शहरापासुन २५ किलोमीटर अंतरावर तर भोर-महाड रस्त्यापासुन २ किलोमीटवर असलेल्या ४० घरांचे ३५६ लोकवस्तीचे कोंढरी हे गाव आहे. गावाच्या वरच्या बाजुला भोकरीचा माळ येथील डोंगरावतील जमिनीला मोठमोठया भेगा पडुन बुधवारी डोंगरातील दगडमाती, झाडे, मेसबांबुची बेटे पावसाच्या पाण्याने वाहुन येऊन मोठी दरड कोसळली. यात कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही. मात्र ५० फुट अंतरावर दरड थांबल्याने डोंगरा खालील पाच घरे बचावली. अन्यथा ही घरे ढिगा-या खाली गाडली गेली असती.  

डोंगरातील दरडीजवळ असलेली भिवा बापु पारठे, चंद्रकांत गोविंद मांढरे, सुरेश चंद्रकांत पारठे, किसन धोंडीबा खरुसे, सुनिल रावजी पारठे, दगडु भागु पारठे यांना संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने स्थलांतरीत केले आहे. या घटनेत संदीप रघुनाथ पारठे यांची मेसाची १०० बेटे व ५० आंब्याची झाडे तर भागु दगडु पारठे यांची १०० मेसाची बेटे असे एकुण २ हजार बांबुच्या झाडांचे नुकसान झाले. तर भिवा पारठे यांचे ५० आंब्यांची झाडे दरड पडुन वाहुन गेले आहे. सुरेश चंद्रकांत पारठे प्रदीप रमेश पारठे यांची भाताची लागवड केलेली २ एकर भात शेती दगड मातीने गाडुन गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत. 

दरड कोसळण्याचा धोका कायम  गावातील सरु बाई यशवंत पारठे व यशवंत पारठे यांच्या जमिनीत कृषी विभागाच्या वतीने सलग समतर चरांच  काम करण्यात आले आहे. या जमिनीला दोन ते तीन फुटांच्या भेगा पडल्या आहेत. या शिवाय कोंढाळकरवस्ती येथील जमिनीलाही भेगा पडल्या असुन पावसाचे पाणी जाऊन भेगा वाढत असल्याने  या ठिकाणीही दरड कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे संपुर्ण गावाला धोका असल्याने गावात भितीचे वातावरण आहे. 

प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू घटनेची महिती मिळताच भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी या ठिकाणी पाहणी करुन पाच कुटुंबांना हिर्डोशी येथील माध्यमीक विद्यालयात हलवले आहे. तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी कालपासुन गावातच आहेत.तर  गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपअभियंता आर.एल ठाणगे यांनीही भेट देऊन पाहणी केली. सहयाद्री रेसक्युसची टीम, महावितरण गावात दाखल झाली असुन काम सुरु आहे.  यावेळी जि.प.सदस्य रणजीत शिवतरे, सुनिल भेलके, लक्ष्मण दिघे, विलास मादगुडे, बबन मालुसरे बाळासो मालुसरे उपस्थित होते.

संपूर्ण गावाचे पुनर्वसन कराया घटनेतून थोडक्यात गाव वाचल्याने   भितीचे वातावरण आहे. यामुळे पूर्ण गावाचे स्थलांतर करण्याची  मागणी कोंढरी ग्रामस्थांनी केले. येथील ५२ कुटुंबांना सुरवडी (ता फलटण) येथे पुर्नवसन मिळाले आहे.मात्र अद्याप त्यांना जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे संपुर्ण गावाचेच पुर्नवसन सुरवडी येथे करावे अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसlandslidesभूस्खलन