शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२५ कोटींची माहिती देणाऱ्या तरुणाला ८ जणांची अपहरण करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 12:36 IST

जळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देजळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राहिलखान, बबलू, आर. के., तेजस चव्हाण, मुन्ना व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - जळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची माहिती देणाऱ्या तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी महेंद्र काशिनाथ पाटील (वय २५, रा. गजानन मंदिर, मुक्ताईनगर, जळगाव) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहिलखान, बबलू, आर. के., तेजस चव्हाण, मुन्ना व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मावळ, हडपसरमध्ये वाटण्यासाठी पैसे आणले असल्याचे फिर्यादीला आरोपींनी सांगितले असा त्यांचा दावा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र पाटील हे जळगावमधील आरपीआय गवई गटाचे उपजिल्हाध्यक्ष आहेत. ते ऑनलाईन मार्केटिंगचे काम करतात. महेंद्र पाटील यांना त्यांचा गावाकडील मित्र डॉ. संदीप ठोसर यांनी जळगावहून पुण्याला २५ कोटी रुपये जाणार असल्याची माहिती दिली. त्यावरुन त्यांनी जळगावचे पोलीस उपअधीक्षक राजेश भागवत यांना कळविले होते. तेव्हा त्यांनी खात्री करुन घेण्यास सांगितले. त्यानंतर महेंद्र पाटील हे खराडी रक्षकनगर येथील मोर मॉलसमोरील कॉनेट लॉजमध्ये गेले. तेथे एका बॅगमध्ये २५ कोटी रुपये रोख असल्याचे फोटो व व्हिडिओ काढून पोलिसांना माहिती देतो, असे त्यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर त्यांनी पाटील यांचे अपहरण केले. राहिल खान व त्याच्या साथीदारांनी त्यांना खराडी, सासवड, कात्रज येथील विविध लॉजवर नेऊन मारहाण केली. त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. हे पैसे देण्यासाठी त्यांना लॉजमध्ये हातपाय बांधून कोंडून ठेवले. त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याची चैन, ब्रेसलेट, घड्याळ व एक कार असा ३ लाख ६७ हजार५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांची सुटका झाल्यावर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. त्यानंतर २५ कोटी रुपयांचा सोक्षमोक्ष लागेल. मात्र, फिर्यादी जी बॅग दाखवत आहे. त्या इतक्या छोट्या बॅगेत २५ कोटी रुपये कसे बसू शकतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपी सापडल्यानंतरच नेमके खरे कारण काय याचा उलगडा होऊ शकेल.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी