शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

Maharashtra School Reopen: पुणे जिल्ह्यातील ७ लाखांहुनही अधिक विद्यार्थी तब्बल २१ महिन्यांनी शाळेत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:04 IST

शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे

पुणे : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची दारे पुन्हा एकदा खुली होणार असून, पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ७ लाख ६३ हजार ३६५ विद्यार्थी येत्या १ डिसेंबरपासून शाळेत जाऊ शकतील, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. परिणामी ऑनलाईन शिक्षणामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान आता थांबणार आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. त्यात आता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना नियमांचे पालन करून सध्या ऑफलाईन शाळा भरविल्या जात आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहेत.

पुणे जिल्ह्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४ हजार २१० शाळा असून १ हजार ३४६ शासकीय अनुदानित शाळा आहेत; तर जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळांची संख्या १ हजार ८९९ असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ४५५ शाळा आहेत. या शाळांमधील सर्वच विद्यार्थी आता शाळेत येऊ शकणार आहेत. सध्या अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पालक ऑफलाईन शाळा केव्हा सुरू होते याची वाट पाहत आहेत.

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी

''शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, राज्य शासनाने आता इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील उपस्थितीमध्ये वाढ करावी. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले'' 

पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार 

''दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक आहेत. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागतच केले जात असल्याचे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी सांगितले.''  

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या

पहिली : १,९०,०६१दुसरी : १,९२,५९२तिसरी : १,९०,१३७चौथी : १,९०,५७५पाचवी : १,८६,९९६सहावी : १,८३,२१४सातवी : १,७७,८७३आठवी : १,७०,८८२नववी : १,६७,८६२दहावी : १,४४,३८४अकरावी : १,२३,०४३बारावी : १,१८,२४८

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाड