शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Maharashtra School Reopen: पुणे जिल्ह्यातील ७ लाखांहुनही अधिक विद्यार्थी तब्बल २१ महिन्यांनी शाळेत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:04 IST

शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे

पुणे : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची दारे पुन्हा एकदा खुली होणार असून, पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ७ लाख ६३ हजार ३६५ विद्यार्थी येत्या १ डिसेंबरपासून शाळेत जाऊ शकतील, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. परिणामी ऑनलाईन शिक्षणामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान आता थांबणार आहे. मात्र, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली प्रसिद्ध करावी. तसेच इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून केली जात आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. त्यात आता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना नियमांचे पालन करून सध्या ऑफलाईन शाळा भरविल्या जात आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहेत.

पुणे जिल्ह्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४ हजार २१० शाळा असून १ हजार ३४६ शासकीय अनुदानित शाळा आहेत; तर जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळांची संख्या १ हजार ८९९ असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ४५५ शाळा आहेत. या शाळांमधील सर्वच विद्यार्थी आता शाळेत येऊ शकणार आहेत. सध्या अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पालक ऑफलाईन शाळा केव्हा सुरू होते याची वाट पाहत आहेत.

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी

''शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, राज्य शासनाने आता इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील उपस्थितीमध्ये वाढ करावी. तसेच पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करावी असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले'' 

पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार 

''दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक आहेत. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागतच केले जात असल्याचे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी सांगितले.''  

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या

पहिली : १,९०,०६१दुसरी : १,९२,५९२तिसरी : १,९०,१३७चौथी : १,९०,५७५पाचवी : १,८६,९९६सहावी : १,८३,२१४सातवी : १,७७,८७३आठवी : १,७०,८८२नववी : १,६७,८६२दहावी : १,४४,३८४अकरावी : १,२३,०४३बारावी : १,१८,२४८

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाड