शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:24 IST

मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज

पुणे : आपल्या मराठी मातीने आपल्याला छत्रपती शिवरायांसारखे कणखर नेतृत्व दिले, लोकमान्यांसारखे विचारवंत दिले, बालगंधर्वांसारखे अस्सल कलावंत दिले. ही यादी भरपूर मोठी आहे, मात्र, दुर्दैव असे की आपल्या मातीमधील या दिग्गजांची, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याची, दिलेल्या बलिदानाची महाराष्ट्राला किंमत राहिलेली नाही, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कलादीप पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवी डॉ. पं. संदीप अवचट यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सुबोध भावे बोलत होते. स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.

भावे म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून मी कलाक्षेत्रात आलो तरीही नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांत काम करायला मला आवडतं. मात्र, समाधान देणारी भूमिका किंवा चांगले मानधन या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट मिळाली पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. नाटक हा मराठी भूमीचा एक अत्यंत महत्त्वाचा श्वास आहे. आपल्याकडे नाटक केवळ पाहिले जात नाही, तर आपण नाटक साजरे करीत असतो. आपल्या या परंपरा टिकवून ठेवत असतानाच मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज आहे, असेही भावे म्हणाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, चित्रपट आणि एकूणच कला क्षेत्रातदेखील कामगारांचे योगदान मोठे असते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची काम करणारी व्यक्ती ही कामगार असते, कारण त्या कामासाठी त्याला श्रम करावे लागतात.

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे Lokmanya Tilakलोकमान्य टिळकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजartकलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण