शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:24 IST

मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज

पुणे : आपल्या मराठी मातीने आपल्याला छत्रपती शिवरायांसारखे कणखर नेतृत्व दिले, लोकमान्यांसारखे विचारवंत दिले, बालगंधर्वांसारखे अस्सल कलावंत दिले. ही यादी भरपूर मोठी आहे, मात्र, दुर्दैव असे की आपल्या मातीमधील या दिग्गजांची, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याची, दिलेल्या बलिदानाची महाराष्ट्राला किंमत राहिलेली नाही, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कलादीप पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कवी डॉ. पं. संदीप अवचट यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सुबोध भावे बोलत होते. स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर उपस्थित होते.

भावे म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून मी कलाक्षेत्रात आलो तरीही नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांत काम करायला मला आवडतं. मात्र, समाधान देणारी भूमिका किंवा चांगले मानधन या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट मिळाली पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. नाटक हा मराठी भूमीचा एक अत्यंत महत्त्वाचा श्वास आहे. आपल्याकडे नाटक केवळ पाहिले जात नाही, तर आपण नाटक साजरे करीत असतो. आपल्या या परंपरा टिकवून ठेवत असतानाच मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज आहे, असेही भावे म्हणाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, चित्रपट आणि एकूणच कला क्षेत्रातदेखील कामगारांचे योगदान मोठे असते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची काम करणारी व्यक्ती ही कामगार असते, कारण त्या कामासाठी त्याला श्रम करावे लागतात.

टॅग्स :PuneपुणेSubodh Bhaveसुबोध भावे Lokmanya Tilakलोकमान्य टिळकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजartकलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण