शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार काा दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
2
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
3
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
4
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
5
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
6
Lifelesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
7
जामताडा बनण्याच्या 'हे' शहर मार्गावर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
8
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
9
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
10
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
11
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
12
कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
13
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
14
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
15
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
16
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
17
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
18
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
19
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
20
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये; 'आप'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:56 IST

पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे

पुणे : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तेथील भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून दिले. आता राज्यातील युती सरकारनेही पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत म्हणून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली.

पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. सोयाबीन पाण्याखाली. कापूस पीक अडचणीत आहे. संत्रा, मोसंबी अशा फळबागांमध्ये गळती होऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे गरजेचे असतानाही राज्य सरकारकडून त्यावर काहीच हालचाल व्हायला तयार नाही. याच सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, आता ते हवेतच विरले आहे. दुसरीकडे अशाच पूरस्थितीमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केलेली आहे. ही मागणी विरोधी पक्षात असताना अनेकजण करतात, परंतु सत्तेवर आल्यावर याची अंमलबजावणी करणारे आपचे सरकार देशातील पहिले सरकार आहे, असा दावा किर्दत यांनी केला.

कर्जमाफीबाबत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहेच, पण फक्त २ हेक्टर जमिनीवरच्या नुकसान झालेल्या पिकासाठीच मदत मिळेल असा निर्णय घेत त्यांनी आधीच पिडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. ही मदतही कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० व बागायतीसाठी १८ हजार इतकीच आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प आहे. त्यात अमेरिकेतून कापूस आयात करण्यासारखे निर्णय सरकार घेत आहे. आता किमान मदतीबाबत तरी सरकारने हात आखडता घेऊ नये. आपचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून या मागणीचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीAam Admi partyआम आदमी पार्टीMONEYपैसाRainपाऊसweatherहवामान अंदाज