शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये; 'आप'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:56 IST

पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे

पुणे : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तेथील भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून दिले. आता राज्यातील युती सरकारनेही पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत म्हणून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली.

पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. सोयाबीन पाण्याखाली. कापूस पीक अडचणीत आहे. संत्रा, मोसंबी अशा फळबागांमध्ये गळती होऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे गरजेचे असतानाही राज्य सरकारकडून त्यावर काहीच हालचाल व्हायला तयार नाही. याच सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, आता ते हवेतच विरले आहे. दुसरीकडे अशाच पूरस्थितीमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केलेली आहे. ही मागणी विरोधी पक्षात असताना अनेकजण करतात, परंतु सत्तेवर आल्यावर याची अंमलबजावणी करणारे आपचे सरकार देशातील पहिले सरकार आहे, असा दावा किर्दत यांनी केला.

कर्जमाफीबाबत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहेच, पण फक्त २ हेक्टर जमिनीवरच्या नुकसान झालेल्या पिकासाठीच मदत मिळेल असा निर्णय घेत त्यांनी आधीच पिडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. ही मदतही कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० व बागायतीसाठी १८ हजार इतकीच आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प आहे. त्यात अमेरिकेतून कापूस आयात करण्यासारखे निर्णय सरकार घेत आहे. आता किमान मदतीबाबत तरी सरकारने हात आखडता घेऊ नये. आपचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून या मागणीचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीAam Admi partyआम आदमी पार्टीMONEYपैसाRainपाऊसweatherहवामान अंदाज