शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Maharashtra Election 2019: पुण्यात निवडणूक रंगतदार अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:44 IST

Maharashtra Election 2019: सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या भाजपा-शिवसेना महायुतीपुढे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे.

पुणे : सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या भाजपा-शिवसेना महायुतीपुढे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार आव्हान उभे केले आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१४ मध्ये भाजपाने १२, शिवसेनेने ३, 'राष्ट्रवादी'ने ३, काँग्रेसने १, मनसेने १ तर 'रासप'ने १ जागा जिंकली होती.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी (बारामती), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा (कोथरुड), विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी (आंबेगाव), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा (इंदापूर) हे राज्यस्तरीय नेते जिल्ह्यातून या वेळी नशीब आजमावत आहेत. गेल्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले, आनंद शर्मा तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद आदी नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत भाग घेतला होता.

सन २०१४ मधील संख्याबळ टिकवून आणखी जागा जिंकण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. तर गेल्यावेळचे अपयश धुवून काढण्यासाठी काँग्रेस आघाडीनेही कोणतीही कसर सोडलेली नाही. या दोन प्रमुख विरोधकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'चे उमेदवार महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी संपलेल्या प्रचारावर पावसाचे सावट होते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही सोमवारी (दि. २१) पावसाचा अंदाज असल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांना वाटू लागली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेcongressकाँग्रेस