शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के

By नितीन चौधरी | Updated: July 20, 2023 17:56 IST

राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा

पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्यापाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. कोयना, वारणा, तुळशी सारख्या मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक साठा जमा झाला आहे. राज्यात गुरुवारी सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा २१ हजार ८८५ दशलक्ष घनमीटर अर्थात सुमारे ३७ टक्के इतका झाला आहे. त्यात सुमारे १४ हजार ८७७ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. सर्वात कमी पाणीसाठा संभाजीनगर विभागात केवळ २५ टक्के पाणीसाठा असून सर्वाधिक साठा कोकण विभागात ६१ टक्के इतका झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस होत असून विशेषत: घाट परिसरात जोरदार पाऊस होत आहे. राज्यातील सर्वात मोठे समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १५६० मिमी पावसाची नोंद झाली असून गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत २५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धरणात आतापर्यंत ३६.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. राज्यात बहुतांश धरणांमध्ये आता पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ होत आहे.

राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यात जिवंत पाणीसाठा ११ हजार ३०१ दलघमी इतका आहे. हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ३९ टक्के इतका झाला आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा २ हजार ८३० दलघमी असून जिवंत पाणीसाठा २ हजार १८७ दलघमी आहे. एकूण क्षमतेच्या हा साठा ३९.६० टक्के इतका आहे. लघू प्रकल्पांमध्ये १ हजार ८४८ दलघमी असून जिवंत पाणीसाठा १ हजार ३८८ दलघमी आहे. एकूण क्षमतेच्या हा साठा २३.५९ टक्के आहे.

विभागनिहाय पाणीसाठा

विभाग                      दलघमी                       टक्केनागपूर                    ३३५७.०५                     ५१.८१अमरावती                २४९६.६०                     ४५.९५संभाजीनगर             ३५६६.५०                     २५.२१नाशिक                   २७८९.५४                     ३२.९५पुणे                        ७२९०.८३                      ३१.२७कोकण                   २३८५.३०                      ६१.५२

राज्य                      २१८८५.८३                    ३६.८५

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीSocialसामाजिकDamधरणMaharashtraमहाराष्ट्र