शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Maharashtra Bandh : 'अमृता वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा आजकाल बोलण्यातही नसतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:41 IST

युपीतील लखीमपूर खेरी घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला आहे.

ठळक मुद्देवहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी

पुणे/मुंबई - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तर, महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोमणा लगावला. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय.

युपीतील लखीमपूर खेरी घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीच्या या बंदला भाजपाने विरोध केला आहे. तर, अमृता फडणवीस यांनी बंदवरुन थेट निशाणा साधला. अमृता फडणवीसांच्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. 

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, 100 कोटींच्या वसुली प्रकरणाशी या बंदला जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. इतकचं नव्हे तर ही वेगवान कार भाजपाच्या केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र चालवत असल्याचं आरोप झाला. 

न्यायालयाने सुमोटो दाखल करुन घ्यावी - फडणवीस

कुणीतरी गाडीखाली चिरडले म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढे निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असे काम होईल तर ते देखील तेवढेच निंदनीय आहे, अशी टीका करत अशा प्रकारचा बंद कसा काय पुकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे बंद केले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाला आवाहन करेन की, याबाबत सुओ मोटो दाखल करून घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAmruta Fadnavisअमृता फडणवीसMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBJPभाजपाFarmerशेतकरी