शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

उजनी धरणातील दूषित पाण्याकडे सरकारने लक्ष द्यावे- महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:57 IST

इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली...

इंदापूर : मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणाच्या रसायनयुक्त दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी बुधवारी (१२) पत्रकारांशी बोलताना केली. इंदापूर दौऱ्यात त्यांनी शहा गावच्या परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात होडीने फेरफटका मारुन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले की, मी पाण्यात मध्यभागी गेलो. तेथील पाणी हातातदेखील घेऊ वाटले नाही. हे पाणी शेतीयोग्य नाही. त्यामुळे माणसाच्या जीविताला या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आपल्या माहितीप्रमाणे सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाने दिलेल्या पाणी अहवालात हे पाणी शेतीयोग्य तर नाहीच, शिवाय जनावरांसाठी पिण्यायोग्यही नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

जे पाणी शेती व जनावरांसाठी योग्य नाही ते लोक पित आहेत. चिलापीवगळता सर्व माशांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत. चिलापीचा अंतदेखील फारसा लांब राहिलेला नाही. पाणी ही काही कालावधीनंतर सडलेल्या अवस्थेत दिसेल, अशा शब्दात त्यांनी आपला खेद व्यक्त केला. राज्य सरकार, प्रदूषण महामंडळाने योग्य ती दखल घ्यावी. संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करावी. उजनीच्या पाण्याचे पूर्णतः शुध्दीकरण करण्यात यावे. पुणे, कुरकुंभ व रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जे प्रकल्प उजनी जलाशयात दूषित व रसायनयुक्त पाणी सोडतात, त्यांना त्या पाण्यावर प्रक्रिया करावयास सांगण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. कंपन्यांनी ती खबरदारी घेतल्यास पाणी दूषित होण्यापासून वाचेल. असंख्य लोक व जलचरांचे प्राण वाचतील, असे ते म्हणाले.

उजनीचे पाणी गटार झालयं....

यावेळी जानकर यांच्याशी संवाद साधताना मच्छिमार पांडुरंग पल्लारी म्हणाले की, उजनी पात्र गटार झाले आहे. चार दिवसांनी ऊन पडल्यावर हे पाणी हिरवे दिसेल. या पाण्याने शेती मारली, जुन्या जातीचे मासे मारले. मासेमारीचा व्यवसाय मारला. आता केवळ चिलापीच मोठ्या प्रमाणात मिळते आहे. आम्ही उजनीचे पाणी प्यायला वापरले तर मरुनच जाऊ, त्यामुळे विंधनविहिरीचे पाणी पितो आहोत.

टॅग्स :PuneपुणेMahadev Jankarमहादेव जानकरDamधरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे