शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:17 IST

राज्यात पावसाच्या तडाख्याने बळीराजाला मोठा फटका बसला

नितीन चौधरी

पुणे : राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे २५ जिल्ह्यांमधील तब्बल १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापैकी केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पंचनाम्याच्या कामाला फटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने पंचनाम्यांचे काम वेगाने होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

राज्यात ४ ते ९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाचा पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यानंतर या पिकांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्याचा सर्वाधिक फटका नुकसानीच्या पंचनाम्यांना झाला. त्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका बसला. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील सुमारे १ लाख ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आतापर्यंत राज्यात केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाले आहेत. त्यासाठी कृषी विभागाने कृषी सेवकांची मदत घेतली. मात्र, सर्व पंचनामे होऊ शकले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने या पंचनाम्यांना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत हे काम करण्यास वेग येईल, अशा आशावाद कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ११७, पालघर २०१७, रायगड ४३२, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ४२७५, धुळे ९०१७, नंदुरबार १८१४, जळगाव ९५२९, नगर १२१९८, पुणे ५७९, सोलापूर ३९७७, सातारा ४८४, संभाजीनगर ७७६२, बीड ११३६५, जालना १५०८०, नांदेड २३८२१, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोल ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलढाणा ३१४७, वाशिम ४९८१, अकोला ६४३, वर्धा ८६ : एकूण १३९२२२

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSocialसामाजिकGovernmentसरकार