शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:17 IST

राज्यात पावसाच्या तडाख्याने बळीराजाला मोठा फटका बसला

नितीन चौधरी

पुणे : राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे २५ जिल्ह्यांमधील तब्बल १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापैकी केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पंचनाम्याच्या कामाला फटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने पंचनाम्यांचे काम वेगाने होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

राज्यात ४ ते ९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाचा पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यानंतर या पिकांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्याचा सर्वाधिक फटका नुकसानीच्या पंचनाम्यांना झाला. त्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका बसला. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील सुमारे १ लाख ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आतापर्यंत राज्यात केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाले आहेत. त्यासाठी कृषी विभागाने कृषी सेवकांची मदत घेतली. मात्र, सर्व पंचनामे होऊ शकले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने या पंचनाम्यांना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत हे काम करण्यास वेग येईल, अशा आशावाद कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ११७, पालघर २०१७, रायगड ४३२, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ४२७५, धुळे ९०१७, नंदुरबार १८१४, जळगाव ९५२९, नगर १२१९८, पुणे ५७९, सोलापूर ३९७७, सातारा ४८४, संभाजीनगर ७७६२, बीड ११३६५, जालना १५०८०, नांदेड २३८२१, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोल ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलढाणा ३१४७, वाशिम ४९८१, अकोला ६४३, वर्धा ८६ : एकूण १३९२२२

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSocialसामाजिकGovernmentसरकार