शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:17 IST

राज्यात पावसाच्या तडाख्याने बळीराजाला मोठा फटका बसला

नितीन चौधरी

पुणे : राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे २५ जिल्ह्यांमधील तब्बल १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापैकी केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पंचनाम्याच्या कामाला फटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने पंचनाम्यांचे काम वेगाने होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

राज्यात ४ ते ९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाचा पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यानंतर या पिकांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्याचा सर्वाधिक फटका नुकसानीच्या पंचनाम्यांना झाला. त्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका बसला. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील सुमारे १ लाख ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आतापर्यंत राज्यात केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाले आहेत. त्यासाठी कृषी विभागाने कृषी सेवकांची मदत घेतली. मात्र, सर्व पंचनामे होऊ शकले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने या पंचनाम्यांना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत हे काम करण्यास वेग येईल, अशा आशावाद कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ११७, पालघर २०१७, रायगड ४३२, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ४२७५, धुळे ९०१७, नंदुरबार १८१४, जळगाव ९५२९, नगर १२१९८, पुणे ५७९, सोलापूर ३९७७, सातारा ४८४, संभाजीनगर ७७६२, बीड ११३६५, जालना १५०८०, नांदेड २३८२१, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोल ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलढाणा ३१४७, वाशिम ४९८१, अकोला ६४३, वर्धा ८६ : एकूण १३९२२२

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसSocialसामाजिकGovernmentसरकार