शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

दोन महिन्यांत किमान ६० टक्के लसीकरण व्हायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

तज्ज्ञांचे मत : पहिल्या लाटेप्रमाणे गाफील राहून चालणार नाही प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : . पहिल्या लाटेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या ...

तज्ज्ञांचे मत : पहिल्या लाटेप्रमाणे गाफील राहून चालणार नाही

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : . पहिल्या लाटेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या निष्काळजीपणाची पुनरावृत्ती दुसऱ्या लाटेनंतर येऊ नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पुढील दोन महिन्यांत किमान ६० टक्के लसीकरण पूर्ण करावे लागेल. १४ ते ४५ या वयोगटालाही तिसऱ्या लाटेचा धोका आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. नुकताच विषाणूचा व्हिएतनाम व्हेरिएंट सापडला आहे. हा ब्रिटिश आणि भारतीय विषाणूचा हायब्रीड असल्याचे बोलले जात असून तो जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये लसींचे तीन डोस देण्याचे नियोजन सुरू आहे. अशा अनपेक्षित संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने आपली आरोग्य यंत्रणा सतर्क असायला हवी, असाही मतप्रवाह पुढे येत आहे.

तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, कोरोना विषाणूने आतापर्यंतचे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरोना गेला, असे वाटले होते. प्रत्यक्षात विषाणू सुप्तावस्थेत गेला होता. त्यानंतर झालेले म्युटेशन आणि निर्माण झालेल्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका आणि वेग अनेक पटींनी वाढला. त्यामुळे अधिक सतर्क राहणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे, यावर भर असला पाहिजे.

-----

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली गेल्यावरच लाट ओसरली, असे म्हणता येते. आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट अद्याप दहाच्या खाली गेलेला नाही. रुग्णसंख्या कमी झाली, तरी प्रति मिलियन ५०० चाचण्या होणे अपेक्षित असते. त्याच वेळी पॉझिटिव्हिटी रेटकडे लक्ष ठेवायचे असते. रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असली तरी सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री विसरता येणार नाही. ९० टक्के जनतेचे लसीकरण होईपर्यंत निर्बंध सुरू ठेवणे गरजेचे आहे.

साठ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बऱ्यापैकी पूर्ण होत आले आहे. ४५ ते ६० वर्षे वयातील काही नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, १८ ते४५ या वयोगटांतील अत्यंत कमी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्र्या लाटेत लहान मुलांना धोका आहे, असे म्हटले जात असले तरी नेमका अंदाज कोणीच बांधू शकत नाही. लहान मुलांएवढा तरुणांनाही धोका असणार आहे. त्यामुळे दुसरी लाट कमी झाली, तरी कोणीही गाफील राहून किंवा निष्काळजीपणा करून चालणार नाही.

- डॉ. दिलीप कदम, अध्यक्ष, पुणे टास्क फोर्स

------

एक-दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर विषाणू पुन्हा सक्रिय झाला आणि अधिक गंभीर, वेगवान अशा दुसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावे लागले. पहिली लाट आली तेव्हा संसर्ग वाढू नये म्हणून काय करायचे, याचे उत्तर आपल्याकडे नव्हते. मात्र, आता लसीकरणाच्या रुपात आपल्याला उत्तर सापडले आहे. सध्या महाराष्ट्रात दररोज १८,००० ते २०,००० रुग्णसंख्या दिसत आहे. त्याचवेळी एका दिवशी पाच ते सहा लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. काही दिवसांमध्ये दररोजची रुग्णसंख्या पाच हजारांपर्यंत कमी होईल. त्याचवेळी दररोज १५ ते २० लाख नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. किमान ६० टक्के लोकांचे पुढील दोन महिन्यांमध्ये लसीकरण झाल्यास तिसरी लाट कदाचित रोखता येऊ शकेल. लसीकरणाचा रोड मॅप तयार करावा लागेल. देशात आतापर्यंत फक्त दहा टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. ० ते १८ वयोगटातील ३० टक्के लोकसंख्या बाजूला ठेवली, तरी १०० कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी २०० कोटी डोस आपल्याला उपलब्ध होणार आहेत का आणि ते किती वेळात उपलब्ध होणार आहेत, याचे नियोजन करावे लागणार आहे.

- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लड

------

लसींची उपलब्धता

लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लस उत्पादक कंपन्यांवरही दबाव आणून चालणार नाही. कारण, युरोपमध्ये काही लसींच्या बॅचच्या बॅच सदोष निघाल्यामुळे तरुणांमध्ये रक्त गोठण्याची उदाहरणे समोर आली. लसींचे उपलब्ध होणारे डोस, लोकसंख्या आणि लसीकरणाचा वेग या सर्व निकषांचा शासनाने बारकाईने विचार करून मगच नियोजन करायला हवे.