शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वरच ; आता मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात लक्ष घालावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 17:23 IST

पुण्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आजवर आपला जीव गमवावा लागला आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना भाजप आमदार यांनी दिले पत्राद्वारे निवेदन

पुणे : पुण्यात दिवसागणिक वाढत असणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु आहेत. कोरोनाग्रस्तांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावे यासाठी पुण्यात जम्बो केअर सेंटरची देखील उभारणी करण्यात आली. पण तिथे देखील वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वयाचा सावळा गोंधळ असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसरीकडे रूग्णांची जीवघेणी हेळसांड होते आहे. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे, अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

पुण्यामध्ये बुधवारी (दि.२) पहाटे एका तरुण पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या पत्रकारालाही उपचार मिळण्यात अनेक अडचणी आल्या.उपचारास विलंब होणे, उपचार न मिळणे यांसारख्या कारणांमुळे पुण्यात अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या पाच महिन्यात वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. आमदार शिरोळे म्हणाले, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. तसेच मृत्यू दर देखील वाढू लागल्याने पुणेकरांमध्ये काळजी व भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील आरोग्य सेवेत दैनंदिन लक्ष घालावे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शहर तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांचा दैनंदिन आढावा घेऊन रुग्णांना सहज वेळेवर उपचार मिळण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची गरज आहे, असे आमदार शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार