शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:59 IST

 भोसरी एमआयडीसीतील उद्योजकांचा हताश आक्रोश, उपाययोजनांबाबत महापालिका, एमआयडीसीची डोळेझाक होत असल्याचा उद्योजकांचा आरोप

- गोविंद बर्गे पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक परिसर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या कहराखाली आहे. आकाशातून बरसणाऱ्या पाण्यासोबत अनेक उद्योजकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. यंत्रसामग्री पाण्यात बुडाली, उत्पादन थांबले, कोट्यवधींचा माल पाण्यात गेला. पण, या सर्वांत अधिक दुःखद गोष्ट म्हणजे, वर्षानुवर्षांची मेहनत आणि स्वप्नं क्षणार्धात वाहून गेली.

भोसरी एमआयडीसी परिसराला नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसाचे पाणी शिरल्याने अनेक छोट्या - मोठ्या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पावसाच्या पाण्याने कंपनीतील उत्पादित माल खराब झाला असून, यंत्रसामग्रीही जलमय झाली. परिणामी उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली. उद्योजकांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. भोसरी एमआयडीसी टी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसाने अनेक कंपन्यांमध्ये रस्त्यावरून वाहात येणारे पाणी घुसले. त्यामुळे उत्पादित मालाचे मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाल्याने कामकाज थांबवावे लागले. अनेक ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचल्यामुळे यंत्रसामग्रीही बंद पडली.हे चित्र दरवर्षीचे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योजक या समस्येवर उपाययोजनांची मागणी करीत आहेत. मात्र, महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून, कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. आम्ही लाखो रुपयांचा कर वेळेवर भरतो. मात्र, पावसाळी पाण्याचा निचरा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. पावसाच्या पाण्याने आमचे मोठे नुकसान झाले. काही कंपन्यांनी प्रशासनाची वाट न बघता विद्युत मोटारी लावून कंपनीतील पाणी बाहेर काढले. येथील उद्योजकांमध्ये प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र नाराजी आहे. 

महावीर रबर इंडस्ट्रीजमध्ये पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात शिरल्याने कंपनीची भिंत कोसळली. रस्त्यावरील कचरा आणि मातीही वाहून आली. पाण्याचा निचरा व कचरा साफ करण्यासाठी चार दिवस लागले. या कालावधीत कंपनीतील कामकाज बंद ठेवावे लागले. त्यामुळे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. -नयन भंडारी ,महावीर रबर इंडस्ट्रीज, टी ब्लॉक भोसरी एमआयडीसी 

ग्रँटॅक इंडस्ट्रीजसह शेजारील चार कंपन्यांसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साठते. अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्यास रस्त्यावर तळे तयार होऊन हे पाणी थेट कंपन्यांमध्ये शिरते. येथील रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्ता थोडा उंच झाला. तसेच भूमिगत सांडपाणी वाहिनी अर्धवट ठेवल्याने हे पाणी कंपन्यांमध्ये शिरून सतत नुकसान होते. गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा ही परिस्थिती उद्भवली होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.  -कृष्णा वाळके, मालक, ग्रँटॅक इंडस्ट्रीज, भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक. या परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे केली होती. स्थापत्य विभागाला सूचना देऊन सध्या निर्माण झालेली समस्या तातडीने दूर केली जाईल. - पजा दुधनाळे, क्षेत्रीय अधिकारी, ह प्रभाग. एमआयडीसी भागातील उद्योजकांच्या समस्यांबाबत महापालिका आणि एमआयडीसीचे सातत्याने दुर्लक्ष होते. तक्रारी केल्यास एकमेकांकडे बोट दाखविले जाते. अधिकाऱ्यांनी केवळ बैठकांचे सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा या भागात पाहणी दौरा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अभय भोर, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater shortageपाणीकपातWaterपाणीRainपाऊस