शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक पॅटर्न बदलतोय

By admin | Updated: August 31, 2016 01:23 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे. भाजीपाला, कडधान्ये व फळलागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यात खरिपात ६ हजार ६६३.४७ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली असून, सोयाबीन ३९५, मूग २१६ तर मका यांची १६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे असलेले भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून, या वर्षी ७२ टक्केच लागवड झाली आहे. गेली काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळेही हा बदल होत आहे. या वर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस असल्याने या परिसरात घेत असलेल्या खरीप हंगामाची स्थिती चांगली आहे. ऊस वगळता १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली आहे. आजअखेर एकूण १०,५८२.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ८१४.० मि.मी. आहे. हा पाऊस पश्चिम भागात चांगला झाला असून, खरीप पिके याच क्षेत्रात घेतली जातात. यात भातपीक हे सर्वांत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, काही दिवसांपासून भाताचे क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी ७ हजार २९०.५३ हेक्टरवर भातपीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७२ टक्के म्हणजे ५ हजार २१०.८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यापुढे लागवड होणार नसल्याने हे क्षेत्र याही वर्षी घटले आहे. मुळशी, मावळ, हवेली, भोर व वेल्हे या तालुक्यांत जमीनविक्री वाढली आहे. त्यामुळे जमिनीला कंपाऊंड पडले असून, तेथे पीक घेणे बंद झाले आहे. त्यामुळे भातपीक कमी होत असल्याचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातही नागरी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्गाची भाजीपाला, फळे, कडधान्यांची जास्त मागणी आहे. हे लक्षात घेता, पारंपरिक पीक न घेता मागणीप्रमाणे पीक घेण्याकडे शेतकरी वळत आहे.बाजरीचे मोठे क्षेत्र होते. त्याची जागा आता बटाटापीक घेत आहे. तसेच, येथे सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी तर ३९५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे.१० ते १५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्वारीपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. तेथील शेतकरी आता मकापिकाकडे वळत आहेत.