शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खडकवासला धरणप्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२४ टीएमसी पाणीसाठी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:09 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरणप्रकल्पात ३.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

पुणे : सिंचन विभागातर्फे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेले पाणी तब्बल २०२ कि.मी.चा प्रवास करून इंदापूरात दाखल झाले आहे. सध्या खडकवासला धरणातून १ हजार २५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असून खडकवासला धरणप्रकल्पात २३.१४ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकल्पात ३.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

    कालवा दूर्घटनेमुळे खडकवासला धरणातून शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी तब्बल एक महिना बंद ठेवावे लागले. त्यामुळे दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही भागातील पिके जळून गेली. पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागात जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले होते. परंतु, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी सोडणे अडचणीचे जाणार आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २६.३८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्ल्क होता. परंतु, यंदा १० नोव्हेंबर रोजी २३.१४ टीएमसी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने धरणात केवळ ०.२२ टीएमसी एवढेचे पाणी आहे.

    महापालिका आणि जलसंपदा विभागाकाकडून कालवा दुरूस्तीच्या कामास विलंब झाल्यामुळे शेत पिकांचे नुकसान झाले.अखेर २८ आॅक्टोबर रोजी कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंतचे कालव्याचे अंतर तब्बल २०२ कि.मी.चे आहे. त्यामुळे २८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आलेले पाणी तीन ते चार दिवसांपूर्वी इंदापूरला पोहचले. कालव्यातून काही दिवसांपासून १,२०५ क्यूसेकने पाणी सुरू होते.परंतु,3 नोव्हेंबरपासून १२५२ क्यूसेकने पाणी सोडले आहे.कालव्यातून सोडलेले पाणी केव्हा बंद करणार याबाबतचे स्पष्टिकरण सिंचन विभागाकडून अद्याप देण्यात आलेले नाही.

खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा धरणाचे नाव         टक्केवारी     टीएमसी खडकवासला         ६६.२०        १.३१वरसगाव               ९५.२८        १२.२२पानशेत                 ८८.२७        ९.४०        टेमघर                     ५.९०        ०.२२    

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ