शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

काश्मीर हा भारताचा पूर्वापार अविभाज्य भागच : 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:00 AM

'काश्मीर’ म्हटलं की फक्त बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, जवानांवर हल्ला हेच ऐकायला मिळतात..

ठळक मुद्देप्रशांत तळणीकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या  ‘जोनराजकृत राजतरंगिणी’ पुस्तक प्रकाशन

अपवाद वगळता एकाही भारतीय नागरिकाला काश्मीरचा इतिहास फारसा माहिती नाही. पुण्यातील काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या  ‘जोनराजकृत राजतरंगिणी’या पुस्तक प्रकाशनानिमित्ताने त्यांच्याशी ’लोकमत’ ने संवाद साधला. -नम्रता फडणीस * काश्मीरचा मूळ इतिहास काय आहे?- काश्मीर हा इतिहासापासूनच भारताचा अविभाज्य भाग आहे.कल्हणाची धुतराष्ट्र राजतरंगिणी हा संस्कृतमधील काश्मीरचा इतिहास भारतामधला अधिकृत इतिहास आहे. हे ब्रिटीशांनी आणि अभ्यासकांनी देखील मानले आहे. हे जर सत्य मानलं तर काश्मीरचा इतिहास हा महाभारतकालापासून सुरू होतो. काश्मीरमध्ये साडेतीनशे वर्ष हिंदू राजवट होती. तोपर्यंत राजे, कवी,कलावंत यांच्यामध्ये आदानप्रदान होत होते. हिंदू राजवट संपून मग मुस्लिम राजवट आली. त्यामुळे काश्मीर भारताचा भाग होता किंवा नव्हता याचा वेगळा पुरावा असण्याची गरजच नाही. * काश्मीरमधील धार्मिक इतिहास काय सांगतो? - काश्मीर मध्ये मूळ वैदिक धर्माबरोबरच बौद्ध धर्मही होता. त्यानंतर इस्लाम धर्म आला. काश्मीरमधील हा इस्लाम भारतीय इस्लाम आहे. जे जे नवीन आले ते लोकांनी स्वीकारले. ‘काश्मिरीयत’ म्हणजे काय तर वैदिक, जैन, बौद्ध आणि इस्लाम धर्माची सरमिसळ आहे. याच रसायन म्हणजे काश्मीर आहे. प्रत्येक धर्म, संस्कृती आणि विचार वेगळा आहे. 1947 नंतर भारताची फाळणी झाली. तेव्हा काश्मीर मुस्लिम बहुल होते. पण फाळणीनंतर काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या नाहीत. थोडक्यात सामान्य जनतेमध्ये धार्मिक ध्रृवीकरण फारसे झालेले नाही. पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावण्यात आले त्यांच्यावर अत्याचार झाले हा काश्मीरवरचा काळा डाग आहे. पण आजही तिथे पंडित आणि मंदिरे आहेत. * काश्मीरच्या प्रश्नाकडे पाहाण्याचा तिथल्या समाजाचा दृष्टीकोन कसा आहे?- या प्रश्नात राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक राजकारण गुंतलेले आहे. काश्मिरी मुसलमान मंदिरात पण जातात घरात गणपती पण बसवतात. समाजात ज्याप्रमाणे वेगवेगळे घटक असतात. तसेच तिथेही बंडखोरी, विद्रोह आहे. पाकिस्तानचा झेंडा कुणी तरी फडकवत असेलही. पण अजूनही 80 टक्के काश्मिरी जनता ही भारताच्या बाजूने आहे तर काहींना स्वतंत्र काश्मीर हवा आहे. * इतिहासाच्या मांडणीतून  गोष्टी साध्य होईल असे वाटते का?-आजपर्यंत शाळांमध्ये काश्मीरचा इतिहास कधीही शिकवला गेलेला नाही.  काश्मीरचा पहिला ललितादित्य नावाचा राजा होता.ज्याचे तुर्कस्थानपर्यंत राज्य होते. सातव्या-आठव्या शतकापर्यंत त्याची राजवट होती. काश्मीरशी जोडल्या गेलेल्या गोष्टींची किमान माहिती असायला हव्यात.  

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासJammu Kashmirजम्मू-काश्मीर