शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

‘कर्मयोगी’ २०२० पर्यंत कर्जमुक्त करणार- हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:24 IST

यंदाच्या सन २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर निश्चित देणार आहे.

बिजवडी : यंदाच्या सन २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर निश्चित देणार आहे. तरी, सर्व सभासदांनी आपला सर्व ऊस यंदा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला घालावा. तसेच, कर्मयोगी २०२० पर्यंत कर्जमुक्त करू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सभासदांना केले.कर्मयोगी साखर कारखान्याची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २२) दुपारी एक वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बिजवडी (ता. इंदापूर) प्रांगणात आयोजित केली होती, त्या वेळी सभेला पाटील बोलत होते. सभेचे प्रास्ताविक कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी केले. तर, सभेचे इतिवृत्त व नोटीस कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.या वेळी पाटील म्हणाले, की कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी एनसीजीसीकडून साडेचार टक्के व्याजदराने ४५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याचे सर्व हप्ते वेळेत फेडले आहेत. तसेच, इतर संस्थांकडून १३२ कोटी कर्ज घेतले होते. ते सर्व कर्ज सण २०२०च्या गळीत हंगामात फेडणार आहे. सन २०२०मध्ये कारखाना कर्जमुक्त करू, अशी ग्वाही पाटील यांनी या वेळी उपस्थित सभासदांना दिली.सन २०१७-१८च्या ऊस गळीत हंगामात ज्या शेतकºयांचा ऊस सुरुवातीला आला. त्यांना २ हजार ४०० रुपये हप्ता दिला; परंतु नंतर साखरेचे दर २ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे नंतर आलेल्या उसाला २,२०० रुपये, तर काहींना २ हजार १०० रुपये दर दिला. त्या सर्व शेतकºयांच्या उसाला लवकरच राहिलेला हप्ता दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.तसेच, कारखाना वसाहतीत आरओ सिस्टीमचे उद्घाटन या वेळी पद्मा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना प्रशासनाने उत्तरे दिली.गेल्या वर्षी साखरेचे दर एकदम कोसळल्यामुळे साखरेच्या प्रत्येक पोत्याला किमान १ हजार रुपये कमी मिळू लागले; त्यामुळे कर्मयोगीला ११० कोटी रुपयांचा साखरविक्रीमध्ये तोटा झाला. कारखान्याच्या २ हजार ९०० सभासदांनी कारखाना स्थापन झाल्यापासून आपल्या उसाचे एक टिपरूदेखील दिलेले नाही, अशी औपरोधिक टीका पाटील यांनी या वेळी केली. त्यामुळे साखरेचे भाव आणखी कोसळणार आहेत. त्यासाठी आपल्या देशात किमान ८० लाख टन कच्ची साखर तयार करावी. ती साखर इंडोनेशिया, चीन आणि बांगलादेश घेण्यास तयार आहेत. त्यामुळे साखर शिल्लक राहणार नाही व साखरचे दरही वाढतील, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.- हर्षवर्धन पाटील

टॅग्स :Puneपुणे