शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्मयोगी’ २०२० पर्यंत कर्जमुक्त करणार- हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:24 IST

यंदाच्या सन २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर निश्चित देणार आहे.

बिजवडी : यंदाच्या सन २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर निश्चित देणार आहे. तरी, सर्व सभासदांनी आपला सर्व ऊस यंदा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला घालावा. तसेच, कर्मयोगी २०२० पर्यंत कर्जमुक्त करू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सभासदांना केले.कर्मयोगी साखर कारखान्याची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २२) दुपारी एक वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बिजवडी (ता. इंदापूर) प्रांगणात आयोजित केली होती, त्या वेळी सभेला पाटील बोलत होते. सभेचे प्रास्ताविक कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी केले. तर, सभेचे इतिवृत्त व नोटीस कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.या वेळी पाटील म्हणाले, की कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी एनसीजीसीकडून साडेचार टक्के व्याजदराने ४५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याचे सर्व हप्ते वेळेत फेडले आहेत. तसेच, इतर संस्थांकडून १३२ कोटी कर्ज घेतले होते. ते सर्व कर्ज सण २०२०च्या गळीत हंगामात फेडणार आहे. सन २०२०मध्ये कारखाना कर्जमुक्त करू, अशी ग्वाही पाटील यांनी या वेळी उपस्थित सभासदांना दिली.सन २०१७-१८च्या ऊस गळीत हंगामात ज्या शेतकºयांचा ऊस सुरुवातीला आला. त्यांना २ हजार ४०० रुपये हप्ता दिला; परंतु नंतर साखरेचे दर २ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे नंतर आलेल्या उसाला २,२०० रुपये, तर काहींना २ हजार १०० रुपये दर दिला. त्या सर्व शेतकºयांच्या उसाला लवकरच राहिलेला हप्ता दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.तसेच, कारखाना वसाहतीत आरओ सिस्टीमचे उद्घाटन या वेळी पद्मा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना प्रशासनाने उत्तरे दिली.गेल्या वर्षी साखरेचे दर एकदम कोसळल्यामुळे साखरेच्या प्रत्येक पोत्याला किमान १ हजार रुपये कमी मिळू लागले; त्यामुळे कर्मयोगीला ११० कोटी रुपयांचा साखरविक्रीमध्ये तोटा झाला. कारखान्याच्या २ हजार ९०० सभासदांनी कारखाना स्थापन झाल्यापासून आपल्या उसाचे एक टिपरूदेखील दिलेले नाही, अशी औपरोधिक टीका पाटील यांनी या वेळी केली. त्यामुळे साखरेचे भाव आणखी कोसळणार आहेत. त्यासाठी आपल्या देशात किमान ८० लाख टन कच्ची साखर तयार करावी. ती साखर इंडोनेशिया, चीन आणि बांगलादेश घेण्यास तयार आहेत. त्यामुळे साखर शिल्लक राहणार नाही व साखरचे दरही वाढतील, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.- हर्षवर्धन पाटील

टॅग्स :Puneपुणे