शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची जैशची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 4:49 AM

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सिंग : आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नौदल सज्ज

पुणे : जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्ल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहे. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, सर्व हल्ले रोखण्यास भारतीय नौदल सज्ज आहे, अशी माहिती नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्रविभाग व लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंतरी सभागृहात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.सिंग म्हणाले, सहा दहशतवादी समुद्रामार्गे देशात घुसल्याची आणि समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागामार्फत मिळाली आहे. यामुळे आम्ही समुद्रात टेहळणी वाढवली आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्र काम केले जात आहे. जागतिक महासत्ता होण्याची चीनची महत्वाकांक्षा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.नौदलाच्या निधीत वाढ होणे गरजेचेनौदलाला २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात १८ टक्के वाटा मिळत होता. मात्र, हा निधी आता १३ टक्यांवर आला आहे. सध्याची सागरी सुरक्षेची आव्हाने बघता त्यात वाढ होणे गरजेचे आहे,’’ असे विचार अ‍ॅडमिरल सिंग यांनी व्यक्त केले. सध्याची भारतीय नौदलाची परिस्थिती पाहता तीन विमानवाहू युद्ध नौका असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने युद्धपोत बनविण्याचा वेग वाढवावा लागणार आहे.